अवघ्या चार महिन्यातच २५ गुन्हे
By Admin | Updated: May 16, 2014 00:32 IST2014-05-15T19:26:28+5:302014-05-16T00:32:45+5:30
महिलांचा रेल्वे प्रवास सुरक्षित असल्याचा दावा नेहमीच रेल्वे पोलिसांकडून केला जातो. मात्र अवघ्या चार महिन्यातच २५ गुन्हे महिला प्रवाशांबाबतीतले घडल्याने हा दावा खोटाच ठरत आहे.

अवघ्या चार महिन्यातच २५ गुन्हे
मुंबई - महिलांचा रेल्वे प्रवास सुरक्षित असल्याचा दावा नेहमीच रेल्वे पोलिसांकडून केला जातो. मात्र अवघ्या चार महिन्यातच २५ गुन्हे महिला प्रवाशांबाबतीतले घडल्याने हा दावा खोटाच ठरत आहे. गेल्या वर्षभरातच ७९ गुन्हे घडले होते. त्यामुळे हे प्रमाण पाहता यंदाच्या चार महिन्यातच घडलेले गुन्हे अधिकच असल्याचे दिसते.
महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे पोलिसांकडून (गर्व्हमेन्ट रेल्वे पोलिस-जीआरपी) लोकलच्या डब्यात पोलिस नेमण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्मवर लोकलच्या शेवटच्या डब्यासमोरही पोलिसांची नेमणूक केलेली असते. साधारण साडे तीन हजारांपेक्षा अधिक पोलिस उपनगरीय रेल्वे स्थानकांवर असून ४८0 रेल्वे पोलिसांना महिला डब्यात नेमण्यात आले आहे. तरीही महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा उपस्थित होतोच. महिला प्रवाशांचा विनयभंग करणे, खून आणि खूनाचा प्रयत्न तसेच पळवून नेण्याच्या केसेस २0१४ च्या चार महिन्यातच दाखल झाल्या आहेत. अवघ्या चार महिन्यातच २५ केसेस दाखल झाल्याचे रेल्वे पोलिसांतील सूत्रांकडून सांगण्यात आले. यात सर्वाधिक केसेस विनयभंगाच्या असून १४ केसेसपैकी १३ केसेचा तपास पोलिसांकडून लावण्यात आला आहे. त्यानंतर खूनाचे तीन गुन्हे असून यात दोन प्रकरणांचा तपास लावण्यात रेल्वे पोलिसांना यश आले असल्याचे सांगण्यात आले. तर पळवून नेण्याच्या घटनाही ४ घडल्या असून यातील दोन प्रकरणांचा छडा लावण्यात आला आहे. २0१३ च्या वर्षभरातच ७९ प्रकरणे महिलांच्या बाबतीतले गुन्हे घडले असून यात ४२ गुन्हे तर विनयभंगाचे असल्याचे सांगण्यात आले.
......
त्याचप्रमाणे २0१४ चार महिन्यात बलात्काराची एक, विनयभंगाचे कमी असलेले प्रमाणाच्या २,खूनाच्या प्रयत्नाची एक घटना घडली आहे.
...........
विनयभंगाच्या १४ केसेस सीएसटी, दादर, ठाणे, कल्याण, कर्जत, पनवेल, वसई आणि पालघर स्थानकात घडल्या आहेत.