शेकडो शेतक:यांचे नुकसान
By Admin | Updated: June 30, 2014 23:11 IST2014-06-30T23:11:55+5:302014-06-30T23:11:55+5:30
जव्हार, मोखाडा, विक्रमगड हे तालुके 99 } आदिवासी तालुके आहेत.

शेकडो शेतक:यांचे नुकसान
>जव्हार : जव्हार, मोखाडा, विक्रमगड हे तालुके 99 } आदिवासी तालुके आहेत. येथील आदिवासींचा मुख्य रोजगार म्हणजे शेती, त्यामुळे सर्व खेडोपाडय़ात आदिवासी बांधव शेती करतात, मात्र पावसाने पूर्ण जून महिन्यात दडी मारल्यामुळे शेतक:यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.
जूनच्या दुस:या आठवडय़ात काही दिवस पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे शेतक:यांनी नेहमीप्रमाणो भात, नागली, तुरी, वरई, उडीद, भुईमूग, हळद, यासारखी महागडी बी-बियाणो घेऊन लागवड केली. त्यानंतर त्याला लागणारे महागडे खतही विकत घेऊन शेतात टाकले आहे. परंतु पावसाने अचानक दडी मारल्यामुळे आणि येत्या काही दिवसांत पाऊस पडेल याचीही काही शाश्वती नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मोठय़ाप्रमाणात शेतक:यांनी नांगरणी केल्या, पेरण्या केल्या, रोजंदारीवर मजूर बोलावले, मात्र गेल्या 18 ते 2क् दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे संपूर्ण लागवड करपून, पेरलेली रोपे मेलेली आहेत. त्यामुळे शेतक:यांचे मोठे नुकसान झालेले असून, शेकडो शेतक:यांनी शासनाने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.
शेकडो शेतक:यांनी तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, पं.स. कृषी विभागात नुकसान भरपाईकरिता अर्ज करून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केलेली आहे. दोन ते तीन महिन्यांपूर्वी अचानक जव्हार व मोखाडा तालुक्यात वादळ आले होते, त्यातही जवळजवळ 25क् ते 3क्क् घरांचे नुकसान झाले होते.
आम्ही मेहनत करून संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन, दिवसरात्र नांगरणी करून, भात पेरण्या केलेल्या आहेत. मात्र पाऊस पडत नसल्यामुळे आम्हा गरीब आदिवासी शेतक:यांवर उपासमाराची वेळ येणार आहे.
बाळू काशीराम खुरकुटे,
हेदीचापाडा, जव्हार
पाऊस सुरू झाल्यामुळे आम्ही पेरणीस सुरवात केली होती, पेरणीनंतर नियमित पाऊस सुरू पाहिजे, मात्र पावसाने अचानक दडी मारल्यामुळे आम्हा गरीब शेतक:यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे.
सुरेश श्रीधर गवळी, वनवासी,
पारोळ : वसई पूर्व भागात पाऊस पडल्याने या भागातील शेतक:यांनी पेरलेल्या महागडय़ा बियाण्याची रोपे करपली असून पावसाअभावी जमिनीला भेगा पडल्या आहे. आता पुढे या अस्मानी संकटाचा सामना कसा करायचा हा प्रश्न ग्रामीण बळीराजाला सतावत आहे.
या भागात शिरवली, पारोळ, आडणो, भाताणो, तिल्हेर, मेठे, कळंभोण या भागामध्ये मोठय़ा प्रमाणात भाताचे उत्पादन घेतले जाते. महागडी बियाणो, खते, मजुर व ट्रॅक्टरचे तासाला वाढणारे भाव यामुळे ग्रामीण शेतकरी हताश झाला असताना या वर्षी पावसाने दडी मारल्याने शेतक:यांना दुष्काळात तेरावा महिना पाहावा लागत आहे. महागडी बियाण्याची पेरणी करून ती पावसाअभावी वाया गेल्याने शेतक:यापुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. पाऊस सुरू झाल्यावर दुबार पेरणीसाठी बियाणो आणायचे कुठून हा प्रश्नही बळीराजाला पडला आहे. तसेच पाण्याअभावी जमिनीला भेगा पडल्याने या भागात सुक्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या अस्मानी संकटाचा सामना कसा करायचा हा प्रश्न बळीराजापुढे निर्माण झाला आहे.
या भागात अजूनही कृषी अधिकारी न फिरकल्याने शासनाचेही दुर्लक्ष या भागावर असून मताचा जोगवा मागणारे राजकीय पक्षही शांत आहेत. विदर्भात, मराठवाडय़ात शेतक:यांसाठी पॅकेज जाहीर करणारे शासन या भागातील शेतक:यांकडे दुर्लक्ष करते का असा सवाल ग्रामीण शेतकरी करीत आहेत.
पावसाअभावी डहाणूत भातशेती करपण्याचा धोका
4डहाणू तालुक्यात पावसाअभावी दुबार भात पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतक:यांकडून तीव्र चिंता व्यक्त केली जात असून भातरोप वाचविण्यासाठी शेतक:यांची धावपळ चालू आहे.
4येत्या दोन तीन दिवसात पावसाने दमदार हजेरी न लावल्यास भातरोपे करपण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
4डहाणू तालुक्यात सुमारे 15 हजार हेक्टर क्षेत्र भातशेती केली जात असून यामध्ये हळवी भातशेती 5 हजार हेक्टर गरवी भातशेती 4 हजार हेक्टर, निमगरवी 6 हजार हेक्टर क्षेत्रवर केली जाते.
4यंदा पावसाने उशिरा आगमन केले असून जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात दाखल होणा:या पावसाने या वर्षी 15 जूननंतर हजेरी लावली.
4 शेतीची सर्व कामे आटोपून पावसाची वाट पाहणा:या बळीराजाने पावसाला सुरूवात होताच लागलीच भात पेरण्या सुरू केल्या मात्र पाच दिवसातच पावसाने विo्रांती घेतली व पुन्हा कडकडीत उन्हाळा निर्माण झाल्यासारखे स्थिती निर्माण
झाली.
4अद्याप त्याला कोंबही आले नाहीत तर ओलावा असलेल्या शेतजमिनीत उगवलेल्या भात रोपाला पावसाचे शिंपण मिळत नसल्याने ते करपून जाण्याची भीती आहे.