भरतीप्रक्रियेचे दीड कोटीही गेले पाण्यात?

By Admin | Updated: June 30, 2014 23:34 IST2014-06-30T23:34:16+5:302014-06-30T23:34:16+5:30

भांडुप बोर्डाच्या 385 सुरक्षारक्षकांना पालिकेत कायम ठेवण्याचा प्रस्ताव मंजुर झाल्याने आता पालिकेने कित्येक वर्षानंतर हाती घेतलेल्या भरती प्रक्रियेला ग्रहण लागले आहे.

Half of the recruitment process went out in the water? | भरतीप्रक्रियेचे दीड कोटीही गेले पाण्यात?

भरतीप्रक्रियेचे दीड कोटीही गेले पाण्यात?

>ठाणो : भांडुप बोर्डाच्या 385 सुरक्षारक्षकांना पालिकेत कायम ठेवण्याचा प्रस्ताव मंजुर झाल्याने आता पालिकेने कित्येक वर्षानंतर हाती घेतलेल्या भरती प्रक्रियेला ग्रहण लागले आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी पालिकेच्या तिजोरीत पैसा नसतांनाही पालिकेने दीड कोटी खर्च करुन ही प्रक्रिया पूर्ण केली होती. परंतु,आताहा पैसा सुध्दा वाया जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 
नुकत्याच झालेल्या महासभेत भांडुप बोर्डाच्या सुरक्षारक्षकांना कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. परंतु ज्या सदस्यांनी विरोध केला होता, त्यांनीच या सुरक्षारक्षकांना पुन्हा कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी 2क्क्3 मध्ये पालिकेने प्रथम भांडुप बोर्डाचे 65 सुरक्षारक्षक घेतले होते. कालांतराने ही संख्या 385 वर गेली आहे. दरम्यान तीन वर्षापूर्वी महापालिकेने सुरक्षारक्षकांची भरती प्रक्रिया सुरु केली होती. यासाठी 17 हजाराहून अधिक अर्ज पालिकेला प्राप्त झाले होते. परंतु या प्रक्रियेत घोळ झाल्याने आणि काही उमेदवार न्यायालयात गेल्याने या प्रक्रियेसाठी करण्यात आलेला लाखोंचा खर्च पाण्यात गेला. त्यानंतर महापालिकेने पुन्हा 385 सुरक्षा रक्षक भरतीसाठी पावले उचलली. त्यानुसार मागील वर्षी या प्रक्रियेला सुरुवात सुध्दा झाली. या भरतीसाठी सुमारे 75 हजारांच्या आसपास अर्ज आले होते. त्यानंतर पालिकेने टप्याटप्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. परंतु पहिल्या तीन दिवसात अपेक्षेपेक्षा अधिक उमेदवारांनी हजेरी लावल्याने पालिकेच्या या प्रक्रियेला हरताळ फासला गेला. त्यानंतर पालिकेने ऑनलाईन अर्ज मागवून जातीनिहाय ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम हाती घेतले. परंतु ही प्रक्रिया करीत असतांना 7क् टक्याला पालिकेने यादी क्लोज केल्याने अनेकांचा हिरमोड झाला. 
दरम्यान, मधल्या काळात पालिकेला एलबीटी पोटी मिळणारे उत्पन्न, मालमत्ता, शहर विकास विभाग आदी स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न कमी झाल्याने पालिकेने या भरती प्रक्रियेतून काढता पाय घेण्याचा निर्णय घेत, पोलीस आयुक्तांशी पत्रव्यवहार केला. यामध्ये या भरतीचा दीड कोटींचा खर्च परवडत नसल्याचे कारण पुढे करीत पोलीस भरतीच्या वेळेस ही प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन केले होते. परंतु पोलिसांनी त्यांची ही मागणी फेटाळली. अखेर पालिकेला या खर्चाचा भार उचलण्याची वेळ आली. 
या दीड कोटींच्या खर्चात पालिका येणा:या उमेदावांचे खानपान, भरतीच्या ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी केलेले व्हीडीओ शुटींग आदींचा यात अंतर्भाव होता. परंतु आता या भरती प्रक्रियेच्या विरोधात काही जण न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला असल्याने आणि आता महासभेने सुध्दा भांडुप बोर्डाच्या सुरक्षारक्षकांना कायम करण्याचा निर्णय घेतल्याने या प्रक्रियेला ब्रेक लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. (प्रतिनिधी)
 
आशा मावळल्या..
च्महापालिकेने प्रथमच पारदर्शकपणो ही भरती प्रक्रिया सुरु केली होती. तसेच 7क् टक्केला यादी क्लोज केल्याने अनेक इच्छुकांच्या आशा मावळल्या होत्या. परंतु यामध्ये काही जवळच्या इच्छुकांचा नंबर न लागल्यानेच काही लोकप्रतिनिधींनी या भरती प्रक्रियेलाच ब्रेक लावल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. 

Web Title: Half of the recruitment process went out in the water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.