मुंबई - मतदार यादीतील गोंधळ पाहता प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना मांडण्यासाठी एकतर २१ दिवसांची मुदत द्या किंवा निवडणूक रद्द करून याद्या सुरळीत करा आणि नंतर निवडणुका घ्या, अशी मागणी ठाकरे बंधूंनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. उद्धवसेना आणि मनसेच्या शिष्टमंडळाने सोमवारी यासंदर्भात राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन चर्चा करत मागण्यांचे पत्रही त्यांना दिले. आदित्य ठाकरे, ॲड. अनिल परब, अंबादास दानवे, बाळा नांदगावकर यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
एक व्यक्ती दोन्हीकडे मतदान करू शकतेदुबार मतदारांसाठी परिशिष्ट ब मध्ये दिलेल्या हमीपत्रानुसार एका मतदार एकाच दिवशी एकाच क्षेत्रात मतदान करू शकतो. परंतु, एखादा मतदार हमीपत्र देऊन एका दिवशी जिल्हा परिषदेमध्ये आणि दुसऱ्या दिवशी पालिका निवडणुकीत मतदान करू शकतो, असे सांगत आयोगाने हे परिशिष्ट बदलावे, अशी मागणीही केली असल्याचे आ. आदित्य ठाकरे यांनी सांगितले.विरोधकांच्या प्रभागातील काही इमारती दुसऱ्या प्रभागात दाखविण्यात आल्या आहेत. हा घोळ मुंबईपुरता नसून ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आदी महापालिका क्षेत्रातही असल्याचे ठाकरे म्हणाले.
Web Summary : Thackeray brothers demand 21 days for voter list objections or poll cancellation due to discrepancies. They met with the election commissioner regarding voter list errors across multiple cities, requesting corrections to prevent duplicate voting and district-level issues.
Web Summary : ठाकरे बंधुओं ने मतदाता सूची आपत्तियों के लिए 21 दिन या विसंगतियों के कारण चुनाव रद्द करने की मांग की। उन्होंने कई शहरों में मतदाता सूची त्रुटियों के संबंध में चुनाव आयुक्त से मुलाकात की, और दोहरी वोटिंग और जिला-स्तरीय मुद्दों को रोकने के लिए सुधार का अनुरोध किया।