गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप
By Admin | Updated: September 4, 2014 23:16 IST2014-09-04T23:16:15+5:302014-09-04T23:16:15+5:30
गेले सहा दिवस मुक्कामास असलेल्या आपल्या लाडक्या बाप्पाला ‘पुढच्या वर्षी लवकर या’ गजरात शुक्रवारी भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला.

गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप
गेले सहा दिवस मुक्कामास असलेल्या आपल्या लाडक्या बाप्पाला ‘पुढच्या वर्षी लवकर या’ गजरात शुक्रवारी भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. जिल्ह्यात अलिबाग, मुरूड, रेवदंडा, उरण, नागोठणो, कर्जत यासारख्या प्रमुख ठिकाणी भक्तांनी वाजतगाजत गणरायाचे विसजर्न केले. तर सुवासिनींनीही गौरीला विधीवत निरोप दिला. जिल्ह्यात सकाळपासूनच वरुणराजाने हजेरी लावल्याने काही ठिकाणी मिरवणुकांवर परिणाम झाला. जिल्हा पोलिसांच्या चोख बंदोबस्ताने सर्वत्र शांततेत विसर्जन झाले.
कर्जत : कर्जत तालुक्यातील कर्जत, नेरळ व माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 5971 गणरायांचे व 2517 गौरींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. गणोशोत्सवात पावसाने आनंदावर विरजण घातले असले तरी विसर्जनाच्या वेळी उघडीप दिल्याने गणपती व गौरींचे विसर्जन पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात करण्यात आले. विशेष म्हणजे नेरळमधील मुस्लीम बांधवांनी मशिदीसमोरून जाणा:या गणरायावर पुष्पवृष्टी केली व नागरिकांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. ही परंपरा अजूनही सुरू असून सर्वधर्मसमभावाचे दर्शन यामधून घडते. कर्जत तालुक्यातील कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाजगी 3830 व सार्वजनिक 8 गणरायांचे आणि 1248 गौरींचे, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाजगी 2083, सार्वजनिक 2 आणि 1249 गौरींचे तर माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाजगी 46, सार्वजनिक 2 आणि 20 गौरींचे असे एकूण 5959 खाजगी व 12 सार्वजनिक गणरायांचे आणि 2517 गौरींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. नेरळचे माजी सरपंच आयुब तांबोळी व जय्यद नजे आदी मुस्लीम बांधवांनी मशिदीसमोरून जाणा:या गणोशमूर्तींवर पुष्पवृष्टी केली व नागरिकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.
गणोश विसर्जनाच्या मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरात भाविक नाचतनाचत विसर्जनाच्या ठिकाणी जातात. फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत दणाणून जात होता. पुढल्या वर्षी गणोशोत्सव वीस दिवस उशिरा आहे तरी पुढच्या वर्षी लवकर या, असे आवाहन करीत गणराय व गौरींचे विसर्जन करण्यात आले. कर्जत नगरपरिषद व नेरळ ग्रामपंचायतीने विसर्जन ठिकाणी चोख व्यवस्था ठेवली होती. (प्रतिनिधी)
रसायनीत भावपूर्ण निरोप
मोहोपाडा/रसायनी : रसायनी व आसपासच्या भागातील गौरी-गणपतींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. परिसरातील एकूण 22क् च्या आसपास सात दिवसांच्या लाडक्या बाप्पांना, तसेच 6क्क् च्या आसपास गौराईंना मोहोपाडा तलावात, बारवई पुलाचे पात्र, रिस पूल, कांबे नदी, पाताळगंगा नदीचे पात्र, सावळे तलाव आदी ठिकाणी भावपूर्ण निरोप देण्यात आला. बाप्पांची वाजतगाजत, गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भक्त धुंद होऊन नाचत होते. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या, या जयघोषात गणोशभक्तांनी गौरी-गणपतींना भावपूर्ण निरोप दिला. यावेळी विसर्जनस्थळी गणोशभक्तांनी मोठी गर्दी के ल्याचे दिसून आले. विसर्जन शांततापूर्ण झाले असून परिसरात पोलिसांनी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
नागोठणोत गौरी-गणोश विसर्जन उत्साहात
नागोठणो : शहरात गौरी आणि गणपती विसर्जन सोहळा मोठय़ा उत्साहात पार पडला. या सोहळय़ास दुपारी चार वाजल्यापासून प्रारंभ झाला. आंगरआळीतील गणपतीचे विसर्जन शृंगारतळे, प्रभुआळीतील शंकर मंदिरासमोरील तळे, तर खडकआळीतील गौरी आणि गणोशाचे विसर्जन जोगेश्वरी मंदिरासमोरील तळय़ात करण्यात आले. मुख्य सोहळा अंबा नदीवरील घाटावर झाला. अंबा नदीत कोळीवाडा, जोगेश्वरीनगर, गुरवआळी, शांतीनगर, बंगलेआळी, बाजारपेठ, हायवेनाका भागातील गणपतींचे विसर्जन करण्यात आले. या वर्षी प्रथमच अंबा नदीतील पाण्याची पातळी वाढली असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून किना:यावर पोलीस निरीक्षक बाळासाहेब दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.