लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबर २०२५ च्या निर्णयानंतर राज्यातील शिक्षकांना दोन वर्षांच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्या निकालाचा दाखला देत इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने १७ ऑक्टोबरला आदेश जारी करून दोन वर्षांत ‘टीईटी’ न उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना सक्तीने निवृत्त करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सुमारे सहा लाख शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करण्याचे आश्वासन दिले असले तरी, त्या आदेशानुसार ‘टीईटी’शिवाय पदोन्नती मिळणार नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार ज्यांची सेवा पाच वर्षांपेक्षा जास्त बाकी आहे, त्यांनी ‘टीईटी’ उत्तीर्ण न केल्यास सेवानिवृत्ती अनिवार्य आहे. दरम्यान, हे मानवाधिकारांचे उल्लंघन आहे, असे जुनी पेन्शन शिक्षक संघटनेचे नेते शंकर धावरे म्हणाले तर, हा निर्णय नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध असल्याचे मत प्रहार शिक्षक न्यायमंच संघटनेचे नितीन इंगळे यांनी व्यक्त केले.
केंद्र किंवा राज्य शासनाने अजून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधारे आदेश पत्र जारी केले नाही. तरीपण सरकारचा एखादी विभाग अशा निर्णय जारी करतो हे अनाकलनीय आहे.- जालिंदर सरोदे, कार्याध्यक्ष, शिक्षक सेना.
Web Summary : Maharashtra teachers may face forced retirement if they don't pass the Teacher Eligibility Test (TET) within two years, following a Supreme Court ruling. This order has created discontent among teachers, with unions calling it a violation of human rights.
Web Summary : सुप्रीम कोर्ट के फैसले के बाद, महाराष्ट्र के शिक्षकों को दो साल में टीईटी उत्तीर्ण होना अनिवार्य है, अन्यथा अनिवार्य सेवानिवृत्ति हो सकती है। इस आदेश से शिक्षकों में असंतोष है, और यूनियनों ने इसे मानवाधिकारों का उल्लंघन बताया है।