Join us
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंपाचे थकीत वीजबिल भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ, ३० नोव्हेंबरपर्यंत शेतक-यांची वीज नाही कापली जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 02:38 IST

राज्यातील कृषी वीजपंपधारक थकबाकीदार शेतक-यांना वीज बिल भरण्यास आज शासनाने १५ दिवासांची मुदतवाढ दिली. आता ३० नोव्हेंबरपर्यंत शेतक-यांची वीज कापली जाणार नाही.

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील कृषी वीजपंपधारक थकबाकीदार शेतक-यांना वीज बिल भरण्यास आज शासनाने १५ दिवासांची मुदतवाढ दिली. आता ३० नोव्हेंबरपर्यंत शेतक-यांची वीज कापली जाणार नाही.कृषी संजीवनी योजना योजनेंतर्गत ७ नोव्हेंबरपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता भरायचा होता. आता चालू वीज बिल ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकºयांना आता भरता येईल.लिफ्टसाठी दीर्घमुदती परवाना विचारधीनलिफ्ट कंपन्यांना दीर्घकालावधीचा परवाना देण्याचेही शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. संघटनेच्या प्र्रतिनिधीसोबत झालेल्या बैठकीत ऊजामंत्र्यांनी ही माहिती दिली.

टॅग्स :शेतकरीमहाराष्ट्र सरकार