ई-वाहनांना येत्या ८ दिवसांत टोलमाफी, भरलेला मिळणार; राहुल नार्वेकर यांनी दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 05:40 IST2025-12-11T05:37:55+5:302025-12-11T05:40:09+5:30
ई-वाहन धोरण २०२५ अंतर्गत समृद्धी आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे आणि अटल सेतू या तीन महामार्गांवर टोलमाफी लागू करण्याचा जीआर २५ मे २०२५ रोजी जारी करण्यात आला आहे.

ई-वाहनांना येत्या ८ दिवसांत टोलमाफी, भरलेला मिळणार; राहुल नार्वेकर यांनी दिले आदेश
मुंबई : राज्य सरकारने ई-वाहनांना टोल माफी जाहीर केली. तरीही टोलवसुली होत असून जनतेला सरकारने दिलेला शब्द मोडला जात आहे. त्यामुळे पुढच्या आठ दिवसांत एकाही ई-वाहनाकडून टोल वसूल केला जाऊ नये, असे स्पष्ट आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी विधानसभेत दिले आहेत.
ई-वाहन धोरण २०२५ अंतर्गत समृद्धी आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे आणि अटल सेतू या तीन महामार्गांवर टोलमाफी लागू करण्याचा जीआर २५ मे २०२५ रोजी जारी करण्यात आला आहे. टोलमाफीचा जीआर जारी झाल्यापासून ज्या ई-वाहनांकडून टोल वसुली झाली, त्यांची रक्कम परत देण्यात यावी, असे आदेशही अध्यक्षांनी सरकारला दिले आहेत.