दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर

By Admin | Updated: July 14, 2014 23:36 IST2014-07-14T23:36:57+5:302014-07-14T23:36:57+5:30

पावसाला आता कुठे सुरुवात होत नाही तोच दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून तालुक्यात तपासण्यात आलेल्या १५२ पाणी नमुन्यांपैकी १३ ठिकाणचे पाणी दूषित आढळले आहे़

Critical question of contaminated water | दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर

दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर

वरपगाव : पावसाला आता कुठे सुरुवात होत नाही तोच दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून तालुक्यात तपासण्यात आलेल्या १५२ पाणी नमुन्यांपैकी १३ ठिकाणचे पाणी दूषित आढळले आहे़ संपूर्ण जिल्ह्यातून घेतलेल्या ३,९६६ पाणी नमुन्यांपैकी तब्बल २२८ ठिकाणचे पाणी दूषित आढळल्याने पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.
या २०१४ वर्षात ठाणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील एकूण ५ हजार ९४४ ठिकाणचे पाणी नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये ३४२ ठिकाणचे पाणी दूषित आढळून आले. मे २०१४ मध्ये १९७८ पैकी ११४ भागांतील पाणी पिण्यास योग्य नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तालुक्यातील १५२ पाणी नमुन्यांपैकी १३ ठिकाणचे पाणी दूषित आढळले. मुरबाड तपासलेले पाणी नमुने २६८ - दूषित २, भिवंडी ४१० - दूषित २९, अंबरनाथ १५५ - २३, शहापूर ४९२ - १९, पालघर ४३० - ३४, तलासरी ३४३ - १२, डहाणू ५२३ - २९, वाडा ३४३ - ४०, मोखाडा २१८ - १४, वसई २०८ दूषित ३, विक्रमगड २५५ - ४ आणि जव्हार तपासलेले पाणी नमुने १६९ आणि दूषित आढळलेले ६ अशी माहिती तालुकानिहाय तुलनात्मक पाणी नमुना तपासणी अहवालात दिली आहे. (वार्ताहर)

Web Title: Critical question of contaminated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.