Join us

Coronavirus: डॉ.दीपक सावंत यांचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 19:19 IST

COVID19: मुंबई-एकाएकी करोनाची दहशत वाढली असून, हाँगकाँग, सिंगापूरमध्ये,अमेरिकेसह देशात आणि राज्यात देखिल कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळं रुग्ण संख्येत भर पडत आहे.

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क: मुंबई-एकाएकी करोनाची दहशत वाढली असून, हाँगकाँग, सिंगापूरमध्ये,अमेरिकेसह देशात आणि राज्यात देखिल कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळं रुग्ण संख्येत भर पडत आहे.'

जगभरातून पर्यटक मुंबई दिल्लीत येतात.त्यांच्या  मार्फत जेएन1 चे व्हेरिएंट येऊ शकतात. त्यामुळे राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांना जगभरातील कोरोना संसर्ग व भारतात वाढणारा संसर्ग विशेषत: मुंबईतील वाढणारे रूग्ण या विषयावर पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे . 

निदान विमानतळावर मॅपिंग व्हावे , मास्क प्रवासात गर्दीच्या ठिकाणी बॅधनकारक असावा लोकांना पॅनिक न करता लोक जागृती व्हावी यापूर्वी आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिल्याची माहिती डॅा दीपक सावंत यांनी दिली.

आपण घेतलेल्या कोरोना लसीची परिणाम कारकता संपली आहे. कारण वॅक्सीन हे ६० ते ७० टक्के ईम्युनीटी देते  कोणतेही वॅक्सीन १००टक्के ईम्युनिटी देत नाही . त्यामुळे पुन्हा वॅक्सीन घेणे आवश्यक आहे कां? तसेच दुसरा डोस घेतलेल्या व्यक्ति एक डोस घेतलेल्या लोकाची संख्या एकूण देशाच्या संख्येच्या ७४ टक्के इतकी आहे. तर ६९टक्के लोकानी दोनही डोस घेतले आहेत. याला अंदाजे ३ वर्षे झाली   आहे.

या काळात कोवॅक्सीन कोविशिल्ड मुळे प्राप्त झालेली ईम्युनीटी टिकते कां? हा संशोधनाचा विषय होऊ शकतो . याचा अभ्यास झाला आहे का?असल्यास  त्याची उत्तरे काय? वैद्यकीय माहिती संशोधन पुरावा मागते. तसेच क्वारॅटाईन आयसोलेशन या टर्मस आती कुणीही पाळणार नाही, त्यामुळे त्याला पर्याय शोधणे आवश्यक आहे. असे अनेक मुद्दे असल्याचे त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्र