स्वच्छ आणि सुंदर स्थानक
By Admin | Updated: May 19, 2014 05:05 IST2014-05-19T05:05:39+5:302014-05-19T05:05:39+5:30
जलद विकास होणारे उपनगर, आणि हिल स्टेशन असणारे उपनगर आदी विशेषणांसोबत मुंबईच्या पटलावर मागील काही वर्षांतच चर्चेत येणार्या मुलुंड स्थानकाचे आणखी दोन परिचय आहेत

स्वच्छ आणि सुंदर स्थानक
मुंबई : जलद विकास होणारे उपनगर, आणि हिल स्टेशन असणारे उपनगर आदी विशेषणांसोबत मुंबईच्या पटलावर मागील काही वर्षांतच चर्चेत येणार्या मुलुंड स्थानकाचे आणखी दोन परिचय आहेत. हे स्थानक १९१८ मध्ये जर्मन-काऊन व कार्टर आणि भारतीय केशवलाल शंघानी नावाच्या व्यक्तींच्या हातांनी सजलेले होते. तसेच नियोजित रस्ते आणि गल्ल्या असणारे हे पहिले उपनगर होते. मुलुंड हे मध्य रेल्वेचे सर्वात स्वच्छ स्टेशन राहिले असून, या स्थानकाने त्यासाठी चार वेळा बक्षीस जिंकले आहे. मध्य रेल्वेद्वारा कुर्ला ते ठाणेपर्यंत टाकण्यात आलेल्या पूर्वीच्या औद्योगिक लाइनचे अवशेष मुलुंडच्या प्लॅटफॉर्म नंबर एकच्या खाली शोधल्यास आजही सापडतील. देशातील सर्वात जुन्या ठाणे आणि भांडुप स्टेशनांदरम्यान औद्योगिक परिसर आणि मुंबई महानगरपालिकेची सीमारेषा म्हणून ओळख नसून पवई, विहारसारखे तलाव, मिस वर्ल्ड युक्ता मुखी आणि स्विमिंगपटू रूपाली रेपाळेसारखे विश्वविख्यात नाव, मुंबई आयआयटी आणि इन्स्टिट्युट आॅफ मरिन इंजिनीअरिंगसारख्या शिक्षण संस्था, मॉल, मल्टिप्लेक्ससारखे असलेले ठिकाण म्हणूनही मुलुंडची ओळख झाली आहे. मुलुंडचा इतिहास खूपच जुना आहे. जेव्हा ग्रामीण भाग घनदाट जंगलाने वेढलेला होता त्या वेळी बौद्ध भिक्षू इथे मोठ्या संख्येने राहत होते. या भिक्षूंमध्ये एका प्रमुख भिक्षूचे नाव ‘मुठ’ होते. त्यांच्याच नावाने या ठिकाणाला ‘मुठकुंड’ असे नाव पडले. त्यानंतर या नावाची मोडतोड करून मग मुलुंड असे नाव पडल्याचे सांगितले जाते. १ मुलुंडला १३ मार्च २00३ रोजी झालेला ट्रेन ब्लास्ट आणि माफियांच्या हालचालींचे केंद्र बनण्यापूर्वी सर्वात शांत उपनगर होण्याचे श्रेय प्राप्त होते.