पद्म पुरस्कारांबाबत राज्याच्या शिफारशींना केंद्राचा ठेंगा! केवळ १ नावचं स्वीकारलं

By यदू जोशी | Published: January 26, 2021 03:30 AM2021-01-26T03:30:00+5:302021-01-26T11:12:23+5:30

९८ जणांची केली होती शिफारस; मात्र केवळ एक नाव स्वीकारले

Center backs state's recommendations on Padma awards Only 1 name accepted | पद्म पुरस्कारांबाबत राज्याच्या शिफारशींना केंद्राचा ठेंगा! केवळ १ नावचं स्वीकारलं

पद्म पुरस्कारांबाबत राज्याच्या शिफारशींना केंद्राचा ठेंगा! केवळ १ नावचं स्वीकारलं

Next

यदु जोशी

मुंबई : पद्म पुरस्कारांसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्राकडे ९८ मान्यवरांच्या नावांची शिफारस केली होती; पण त्यातील केवळ ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्रीचा बहुमान मिळाला. शिवाय, सिंधुताईंना पद्मभूषण द्यावे, अशी शिफारस राज्याने केली होती. मात्र, त्यांना पद्मश्रीने गौरविले जाणार आहे.

प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी, लिटिल मास्टर सुनील गावसकर, एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख यांचे नाव पद्मविभूषणसाठी पाठविले होते. मात्र, महाराष्ट्रातून कोणालाही हा पुरस्कार मिळालेला नाही, तर सिंधुताई सपकाळ, ‘सिरम’चे अदर पूनावाला, प्रोफेशनल स्कायडायव्हर शीतल महाजन, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेते मोहन आगाशे, कै. राजारामबापू पाटील व डॉ. मिलिंद कीर्तने यांची नावे पद्मभूषणसाठी गेल्या सप्टेंबरमध्येच केंद्राकडे पाठविण्यात आली होती. पद्मश्रीसाठी खा. संजय राऊत, यशवंतराव गडाख, डॉ. जगन्नाथ दीक्षित, मधुकर भावे यांच्यासह ८८ नावांची शिफारस राज्याकडून केली गेली होती.

पद्मश्रीसाठी शिफारस केलेली नावे अशी होती - मारुती चितमपल्ली, अनिरुद्ध जाधव, प्रकाश खांडगे, विजया वाड, सदानंद मोरे, शिवराम रेगे (मरणोत्तर), शं.ना. नवरे (मरणोत्तर), दीपक मोडक, विठ्ठल पाटील, शंकरराव काळे (मरणोत्तर), लक्ष्मीकांत दांडेकर, यशवंतराव गडाख, राधेश्याम चांडक, निरजा बिर्ला, राजश्री पाटील, धनंजय दातार, प्रभाकर साळुुंखे, उदय कोटक, विलास शिंदे, शशिशंकर (रवी) पंडित, उदय देशपांडे, प्रभात कोळी, खाशाबा जाधव (मरणोत्तर), अंजली भागवत, अजिंक्य राहाणे, युवराज वाल्मीकी, शंकर नारायण, स्मृती मानधना, वीरधवल खाडे, अशोक हांडे, रोहिणी हत्तंगडी, आरती अंकलीकर टिकेकर, अश्विनी भिडे देशपांडे, विठाबाई नारायणगावकर (मरणोत्तर), सत्यपाल महाराज, ऋतिक रोशन, रघुवीर खेडकर, सुबोध भावे, प्रेमानंद गजवी, अशोक पत्की, अनिल मोहिले (मरणोत्तर), दिलीप प्रभावळकर, सुधीर गाडगीळ, राणी मुखर्जी, उद्धवबापू आपेगावकर, नागराज मंजुळे, गौतम राजाध्यक्ष (मरणोत्तर), रणवीरसिंग, मोहन जोशी, अशोक सराफ, राजदत्त, ऋषी कपूर (मरणोत्तर), अजय-अतुल, मुक्ता बर्वे, विक्रम गोखले, डॉ. अमोल कोल्हे, मिलिंद गुणाजी, पंडित अजय पोहनकर, जॉनी लिवर, डॉ. दुरू शहा, डॉ. ऋतुजा दिवेकर, मीनल भोसले, डॉ. शैलेश श्रीखंडे, डॉ. चित्तरंजन पुरंदरे, डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. राहुल पंडित, डॉ. सुरेश भोसले, डॉ. मुफझल लकडावाला, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. प्रतीत समदानी, डॉ. हिंमतराव बावसकर, डॉ. सुलतान प्रधान, अफरोज शहा, दिनू रणदिवे (मरणोत्तर), मधुकर भावे, एकनाथ ठाकूर (मरणोत्तर), जयंत बर्वे, संजीव उन्हाळे, आभा लांबा, विजयसिंह थोरात, गुलाबराव पाटील (मरणोत्तर), संजय राऊत, दीपक साठे (मरणोत्तर), हंसा योगेंद्र, रमाकांत कर्णिक.

मी कधी कल्पना केली नाही, असं काही तरी घडलं आहे. मला फक्त जगायचं आणि जगवायचं होतं. एवढाच फक्त माझा उद्देश होता. माझी लेकरं, लोकांनी दिलेला आधार आणि माझ्या कार्याची वेळोवेळी दखल घेत, सहकार्य करीत कामाला सन्मान प्राप्त करून देणाऱ्या ‘लोकमत’ला देखील मी हा ‘पद्मश्री’ समर्पित करत आहे.- सिंधुताई सपकाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या

सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी एक पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद झाला आहे.आयुष्यातील आनंदाचा क्षण आहे. यामुळे साहित्य लेखनाची जबाबदारी खूप वाढली आहे. आता अजून गांभीर्याने लिहावे लागेल. सध्या हाताशी नवीन लेखन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र कथेच्या रुपात मांडतोय, हा एक नवीन प्रयोग आहे. आतापर्यंत असे चरित्र आलेले नाही. - नामदेव कांबळे, शिरपूर, ता. मालेगाव, जि. वाशिम, पद्मश्री पुरस्कार प्राप्त  

रजनीकांत देवीदास श्रॉफ (पद्मभूषण), गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, परशुराम आत्माराम गंगावणे, जसवंतीबेन पोपट, सिंधुताई सपकाळ (पद्मश्री) या सहा जणांना पुरस्कार मिळाले. त्यातील सिंधुताई वगळता अन्य नावांची शिफारस राज्य शासनाने केलेली नव्हती.

सामाजिक क्षेत्रात काम सुरू केले तेव्हा अनेकांच्या सहकार्याने हे काम करू शकलो. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्नेही, प्रचारक दामूअण्णा दाते, मुकुंदराव पणशीकर, रमेश पतंगे तसेच भटक्या विमुक्त विकास परिषदेचे कार्यकर्ते या सर्वांचा समावेश आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे या विषयाला न्याय देण्यात मला यश मिळाले. महाराष्ट्रात पारधी म्हटले की चोऱ्या माऱ्या, दरोडे असे असायचे. पण यावर्षी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १०० पारधी महिला, पुरुष निवडून आले. या लोकशाहीच्या प्रवाहात माझा खारीचा वाटा आहे, याचे मला समाधान आहे. - गिरीश प्रभुणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Center backs state's recommendations on Padma awards Only 1 name accepted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.