राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे. त्यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर आणि ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर सडकून टीका केली. "राज ठाकरेंची भाषणं असतात भारी, पण कामाच्या नावाने असते पाटी कोरी," अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंच्या भाषणांवर टोलेबाजी केली.
रामदास आठवले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, राज ठाकरेंची भाषणं ऐकायला भारी असतात, मात्र प्रत्यक्ष कामाच्या बाबतीत त्यांची पाटी कोरी आहे. "आम्ही आठवड्याला ६००-७०० लोकांना प्रत्यक्ष भेटतो, त्यांच्या सुख-दुःखात धावून जातो. त्यामुळेच मुंबईकरांच्या हृदयात आमचे स्थान अढळ आहे," असा दावा आठवलेंनी केला आहे. केवळ गर्दी जमवून समस्या सुटत नाहीत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
राज ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आठवले पुढे म्हणाले की, "राज ठाकरेंचा आणि संविधानाचा मेळ बसत नाही. ज्यांनी आंबेडकरी समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, त्यांचे राजकारण आता संपत आले आहे." विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांना हे गणित कसे काय दिसत नाही, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना यांच्यात पडद्यामागे सुरू असलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर आठवलेंनी हा हल्लाबोल केला. "तुम्ही कितीही युती करा, पण आगामी निवडणुकीत मुंबईत तुमची विजयाची पणती पेटणार नाही," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Web Summary : Ramdas Athawale criticized Raj Thackeray, stating his speeches are impressive but lack practical work. Athawale emphasized his party's outreach and questioned Thackeray's commitment to the constitution, predicting defeat in upcoming elections.
Web Summary : रामदास अठावले ने राज ठाकरे की आलोचना करते हुए कहा कि उनके भाषण प्रभावशाली हैं लेकिन जमीनी स्तर पर काम नहीं है। अठावले ने अपनी पार्टी के प्रयासों पर जोर दिया और ठाकरे की संविधान के प्रति प्रतिबद्धता पर सवाल उठाया, आगामी चुनावों में हार की भविष्यवाणी की।