लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेश समितीने गुरुवारी अखेर जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात झोपडपट्टी पुनर्विकास, पाणीपुरवठा, सार्वजनिक वाहतूक, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता कर्मचारी, महिला आणि असंघटित कामगारांना डोळ्यासमोर ठेवून आश्वासने देण्यात आली आहेत.
एसआरए प्रकल्पात मिळणारी घरे मूलभूत हक्क असल्याचे नमूद करीत पात्र झोपडपट्ट्यांचा त्याच जागी पुनर्विकास, किमान ५०० चौ. फुटाचे घर, रखडलेले प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले आहे.
जाहीरनाम्यात नेमके काय?
संपूर्ण मुंबईत २४ तास अखंड पाणीपुरवठा, दरडोई किमान १३५ लिटर पाणी, पाणी दरात ३० टक्के कपात आणि मिठी नदीसह अन्य जलस्रोतांचे पुनरुज्जीवन.
बेस्ट बस सेवेच्या पुनरुज्जीवनासाठी उपनगरातील वीजपुरवठा अदानीकडून पुन्हा बेस्टकडे आणल्यामुळे बसभाडे कमी होईल आणि करारावरील चालकांना कायमस्वरूपी नोकऱ्या.
बंद पडलेल्या मराठी माध्यमांच्या शाळांचे पुनरुज्जीविन, शिक्षक भरती व प्रशिक्षण, पारलिंगी समुदायासाठी स्वतंत्र शाळा आणि ग्रंथालयांचे पुनरुज्जीवन.
पालिका रुग्णालयांतील रिक्त पदे भरणे, झोपडपट्ट्यांत आपला दवाखाना जाळेविस्तार आणि विशेष रुग्णालयांची उभारणी.
Web Summary : VBA's Mumbai manifesto pledges slum redevelopment with 500 sq ft homes, 24-hour water supply at reduced rates, BEST revival with cheaper fares, Marathi school restoration, and improved healthcare facilities, focusing on marginalized communities and unorganized workers.
Web Summary : वीबीए के मुंबई घोषणापत्र में 500 वर्ग फुट घरों के साथ झोपड़पट्टी पुनर्विकास, कम दरों पर 24 घंटे पानी की आपूर्ति, सस्ते किराए के साथ बेस्ट का पुनरुद्धार, मराठी स्कूल जीर्णोद्धार और बेहतर स्वास्थ्य सुविधाओं का वादा, हाशिए के समुदायों और असंगठित श्रमिकों पर ध्यान केंद्रित किया गया है।