मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला मुंबई महापालिकेत भाजप व शिंदेसेनेतर्फे एकही जागा दिलेली नसतानाही आठवले मात्र महायुतीच्या प्रचारात सक्रिय आहेत. एकीकडे आठवलेंचे १२ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात असताना आठवलेंना आपली खासदारकी व मंत्रिपद सांभाळण्यासाठी महायुतीसोबत राहणे भाग पडल्याची चर्चा आहे.
आठवलेंतर्फे १७ जागांची मागणी करण्यात आली होती. पण, पक्षातर्फे १२ उमेदवार आता रिंगणात आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर भाजप व शिंदेसेना प्रत्येकी ६ प्रमाणे एकूण १२ जागा सोडतील, असा विश्वास आठवलेंकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र, एकही जागा पक्षाला मिळाली नाही. त्यानंतरही आठवले महायुतीच्या प्रचाराच्या शुभारंभाला उपस्थित होते. आठवलेंची राज्यसभेची मुदत २ एप्रिलला संपुष्टात येत आहे, त्यामुळे खासदारकी व मंत्रिपद टिकवण्यासाठी आठवले भाजपसोबत असल्याची चर्चा रंगली आहे.
होत असलेले आरोप चुकीचे : पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे म्हणाले की, आठवलेंवर होत असलेले आरोप चुकीचे आहेत. आमच्या पक्षामुळे व आठवलेंमुळे मोठ्या प्रमाणात समाजाची मते महायुतीला मिळत आहेत. भाजपचे नेते याची योग्य ती दखल घेतील.
Web Summary : Despite RPI not getting BMC seats, Athawale supports Mahayuti. His Rajya Sabha term ends soon, fueling speculation he's staying with BJP to retain his position.
Web Summary : आरपीआई को बीएमसी सीटें न मिलने के बावजूद, आठवले महायुति का समर्थन करते हैं। उनका राज्यसभा कार्यकाल जल्द ही समाप्त हो रहा है, जिससे अटकलें लगाई जा रही हैं कि वह अपनी स्थिति बनाए रखने के लिए भाजपा के साथ हैं।