बेस्टला पालिकेचा ठेंगा, जबाबदारी नाकारली, सत्ताधारी विरुद्ध प्रशासन सामना रंगण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 04:01 AM2017-08-24T04:01:26+5:302017-08-24T04:01:28+5:30

बेस्ट कामगारांना संप मागे घेण्यास भाग पाडताना, सत्ताधारी शिवसेनेने महापालिका जबाबदारी उचलेले, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रशासनाने शिवसेनेचे आश्वासन खोटे पाडत, बेस्टला आर्थिक आधार देण्यास नकार दिला आहे.

Best of the children, the responsibility denied, the signs of the game of governance vs administration | बेस्टला पालिकेचा ठेंगा, जबाबदारी नाकारली, सत्ताधारी विरुद्ध प्रशासन सामना रंगण्याची चिन्हे

बेस्टला पालिकेचा ठेंगा, जबाबदारी नाकारली, सत्ताधारी विरुद्ध प्रशासन सामना रंगण्याची चिन्हे

googlenewsNext

मुंबई : बेस्ट कामगारांना संप मागे घेण्यास भाग पाडताना, सत्ताधारी शिवसेनेने महापालिका जबाबदारी उचलेले, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रशासनाने शिवसेनेचे आश्वासन खोटे पाडत, बेस्टला आर्थिक आधार देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी विरुद्ध प्रशासन असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पुढील पाच वर्षे बेस्टला सुमारे १० हजार कोटी रुपये देण्याची मागणी होत आहे. मात्र, हे पैसे देऊन बेस्टच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल, परंतु सेवेत कोणताही बदल होणार नाही. हे पैसे दिल्यास, मुंबई महापालिकेच्या प्रकल्पांकरिता १० हजार कोटी रुपयांची तूट निर्माण होईल. त्यामुळे तुम्हाला वाईट वाटेल, पण मी एक छदामही देऊ शकत नाही, असे आयुक्तांनी पालिका अर्थसंकल्पावर निवेदन करताना स्पष्ट केले.बेस्टचा नफा ५०० कोटी रुपयांचा असला, तरी त्यात ३०० कोटींची तूट आहे, असे आयुक्तांनी निदर्शनास आणले, तर महापालिकेला मलजल शुद्धिकरण केंद्र, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, जल प्रकल्प, कोस्टल रोड आदींसाठी एकूण ५७ हजार ८०० कोटींची गरज आहे. या प्रकल्पासाठी १६ हजार कोटींची तूट पालिकेला येणार आहे. त्यामुळे बेस्टला १० हजार कोटी देणे योग्य होणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

ठेवींच्या माध्यमातून मदत करावी
- मुंबई महापालिकेच्या ६० हजार कोटींच्या ठेवी आहेत, त्यातून पुढील पाच वर्षे नऊ हजार ७०० कोटी रुपयांचा निधी बेस्टला देण्याची मागणी केली जात आहे. या मुदत ठेवींपैकी १८ हजार ९७६ कोटी रुपये भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतनाची रक्षक, तसेच ठेकेदारांची अनामत रक्कम यातील आहे. यातून सुमारे ४२ कोटी रुपये शिल्लक राहतात.

तोटा कायम राहणार : बेस्टला ९७०० कोटी रुपये दिल्यास बेस्टची सेवा सुधारणार नाही. आता जो तोटा होत आहे, तो पाच वर्षांनंतरही होणार आहे. त्यामुळे बेस्टच्या आर्थिक तुटीवर उपाय शोधायला हवा. शेअर टॅक्सी आणि रिक्षा सेवा बंद करण्यात यावी, अशी सूचना पुढे येत आहे, परंतु आपण स्पर्धेच्या युगात असल्याने, शेअर रिक्षा, टॅक्सीसोबतच अ‍ॅप बेस्ड टॅक्सी असताना बेस्टला कसे पुढे नेता येईल, याचा विचार करायला हवा. बेस्ट बस वेळेवर धावणे, प्रवाशांमध्ये विश्वास निर्माण करणे हे दोन उपाय करावे लागतील, असे आयुक्तांनी सुचविले आहे.

फिडर मार्गांवर भाडेवाढ टाळणे : बेस्टचे ७० ते ७५ टक्के प्रवासी छोट्या मार्गावरील आहेत. त्यामुळे तिकीट दरात वाढ करताना छोटे बसमार्ग वगळावे. कामगारांच्या सेवा, सुविधा, भत्ते बंद करावे.

Web Title: Best of the children, the responsibility denied, the signs of the game of governance vs administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.