लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : हवामान बदलामुळे नुकसान झालेल्या कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना हेक्टरी २२ हजार रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. फळपीक उत्पादकांनी विमा काढला आहे त्यांना जास्त मदत मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना यासंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, वातावरणातील बदलामुळे आंबा आणि काजूला कमी प्रमाणात फळधारणा झाली आहे. क्षेत्रीय पातळीवर झालेल्या नुकसानीचा अहवाल मागवला असून सकृतदर्शनी फळबागांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे.
कोकणात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात १ लाख २४ हजार हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे. तर काजू पिकाखाली १ लाख ७५ हजार १४० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. मागील वेळी आपण आंबा आणि काजू उत्पादकांना १५ हजार हेक्टरी मदत दिली होती, यावेळी ती हेक्टरी २२ हजार रुपये केली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
अंतिम आठवडा प्रस्तावासह अन्य प्रस्तावांवर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आंबा आणि काजूसह धान उत्पादकांनाही बोनस देण्यात येईल त्यासंबंधीची कार्यपद्धती निश्चित करण्यात येत असल्याचे सांगितले.
Web Summary : Chief Minister Fadnavis announced ₹22,000 per hectare aid for mango and cashew farmers in Konkan affected by climate change. Farmers with insurance will receive more assistance. The decision follows reports of reduced fruit yields due to weather fluctuations in Palghar, Thane, Raigad, Ratnagiri, and Sindhudurg districts. Rice farmers will also receive bonuses.
Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस ने जलवायु परिवर्तन से प्रभावित कोंकण के आम और काजू किसानों के लिए ₹22,000 प्रति हेक्टेयर सहायता की घोषणा की। बीमा वाले किसानों को अधिक सहायता मिलेगी। यह निर्णय पालघर, ठाणे, रायगढ़, रत्नागिरी और सिंधुदुर्ग जिलों में मौसम के कारण फलों की कम उपज की रिपोर्ट के बाद लिया गया है। धान किसानों को भी बोनस मिलेगा।