Join us

अवकाळीच्या सरी पडल्या पथ्यावर, दीपावलीतील हवा प्रदूषण गेले वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 08:12 IST

छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, जळगाव, भिवंडी, मिरा भाईंदर शहरातील हवा आणखी खराबच

बाळासाहेब बोचरे 

मुंबई : हवा प्रदूषणाबाबत सतत चिंतेत असतानाही आपण दिवाळीच्या जल्लोषात फटाके फोडतो आणि हवा आणखी बिघडवतो. आणि दिवाळीनंतर सर्दी-खोकला यासारख्या आजाराला आमंत्रण देतो. यंदा मात्र ऐन दिवाळीतच पाऊस आल्याने वाढलेले हवा प्रदूषण लगेचच पूर्णतः विरून गेले सर्वत्र स्वच्छ हवा अनुभवास येत आहे. छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, जळगाव, भिवंडी, मीरा भाईंदर शहरातील हवेची गुणवत्ता मात्र खालावल्याचे आढळून आले.

निर्देशांक किती ? 

पावसाळा थांबल्यानंतर ११ ते २० ऑक्टोबरपर्यंत राज्यातील हवा प्रचंड प्रदूषित झाल्याचे पाहायला मिळाले. अगदी निर्देशांक १८०पर्यंत गेला होता. परंतु ऐन दिवाळीत पाऊस झाल्याने घडीला महाराष्ट्राचा हवा स्वच्छ झाली आणि आजच्या हवेचा सरासरी निर्देशांक ५७ ते ९९ असा आहे.

२४तास मोजमाप

देशातील विविध शहरातील हवेची गुणवत्ता दर्शविणारा निर्देशांक असतो. त्यामध्ये शून्य ते ५० पर्यंत निर्देशांक असलेली शहरे पूर्ण स्वच्छ मानली जातात.

५० ते १०० या दरम्यान निर्देशांक असलेली शहरे प्रदूषणाकडे वाटचाल करणारी मानली जातात. १०० ते १५० पर्यंत निर्देशांक असेल तर हवा बिघडली असे मानले जाते. २०० पर्यंत निर्देशांक गेल्यास हवा अपायकारक मानली जाते. २००च्या वर आणि ३०० पर्यंत निर्देशांक असेल तर गंभीर बाब मानली जाते. ३००च्या वर निर्देशांक गेल्यास अशा शहरातील हवा ही शरीरास धोकादायक मानली जाते.

राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरे

१३८ मीरा भाईंदर

१३४ भिवंडी

१२४ भुसावळ

११९ छत्रपती संभाजीनगर

१०७ जळगाव

विविध शहरे आणि हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक

१    धुळे    ९०२    अकोला    ९०३    परभणी    ८९४    नागपूर    ८७५    अहमदनगर    ८४६    नांदेड    ८२७    अमरावती    ७९८    मालेगाव    ७७९    कुपटी    ७६१०    यवतमाळ    ७५११    जुन्नर    ७४१२    चिंचवड    ७३१३    लातूर    ७२१४    सांगली    ७०१५    धाराशिव    ६८१६    पुणे    ६७१७    नवी मुंबई    ६६१८    पाचगणी    ६५१९    कोल्हापूर    ६४२०    खेड    ६३२१    इचलकरंजी    ६२२२    उल्हासनगर    ६१२३    चंद्रपूर    ६०२४    कल्याण    ५९२५    मुंबई    ५७२६    ठाणे    ५६२७    धामणगाव    ५५२८    नाशिक    ५४२९    सोलापूर    ५२३०    तारापूर    ४९ 

English
हिंदी सारांश
Web Title : Untimely Rains Clear Diwali Air Pollution, Improving Air Quality

Web Summary : Unseasonal rains during Diwali significantly reduced air pollution across Maharashtra. While cities like Mumbai experienced cleaner air, areas like Mira Bhayandar and Chhatrapati Sambhajinagar still showed elevated pollution levels. The average air quality index improved drastically, bringing relief from post-Diwali smog.
टॅग्स :मुंबईचा पाऊसदिवाळी २०२५