Join us

कॅप्टन सौरभ सभरवाल यांचे पार्थिव मुंबईत दाखल; ८२ वर्षीय पित्याने हात जोडून रडत दिला शेवटचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:47 IST

विमान अपघातात जीव गमावलेल्या कॅप्टन सुमित सभरवालच्या वडिलांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आपल्या मुलाला भावनिक श्रद्धांजली वाहिली.

Air India Plane Crash: एअर इंडिया विमान अपघातानंतर विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांचे पार्थिव मंगळवारी मुंबईत आणण्यात आले. सभरवाल यांचे पार्थिव सकाळी विमानाने मुंबई विमानतळावर पोहोचले. त्यानंतर, त्यांचे कुटुंबीय ते पवईतील जलवायू विहार येथील त्यांच्या निवासस्थानी घेऊन गेले. यावेळी सुमित सभरवाल यांचे वडील भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या वडिलांनी त्यांच्या मुलाला भावनिक श्रद्धांजली वाहिली. 

गेल्या आठवड्यात गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही क्षणात कोसळले. लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या दुर्दैवी विमानाचे उड्डाण कॅप्टन सभरवाल करत होते. डोळ्यात अश्रू आणि हात जोडून ​​कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या वडिलांनी मुलाला अंतिम श्रद्धांजली वाहिली. अहमदाबाद विमान अपघाताने केवळ एका अनुभवी वैमानिकाचा जीव घेतला नाही तर एका मुलाला त्याच्या वृद्ध वडिलांपासून कायमचे दूर केले. सभरवाल यांनी त्यांच्या वडिलांना वचन दिले होते की ते नोकरी सोडून पूर्णवेळ त्याची काळजी घेतील. मात्र त्याआधीच सौरभ हे वडिलांची साथ सोडून गेले.

डीएनए चाचणीद्वारे ओळख पटल्यानंतर आज सकाळी सौरभ सभरवाल यांचा मृतदेह विमानाने मुंबईत आणण्यात आला. सुमित यांचे पार्थिव घरी पोहोचताच वृद्ध वडिलांच्या डोळ्यात असहाय्यता आणि अश्रूंच्या लाटा आल्या. त्यावेळी वडिलांनी केवळ आपला आधारच गमावला नाही तर त्यांचे संपूर्ण आयुष्य संपल्यासारखे वाटले. सौरभ यांना त्यांचे वडील हात जोडून शेवटचा निरोप देत असताना त्यांना पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. ५६ वर्षीय सभरवाल यांचे अनेक मित्र आणि नातेवाईक आणि स्थानिक रहिवासी श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमले होते.

कॅप्टन सुमित सभरवाल यांना ८,२०० तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव होता आणि ते निवृत्त होऊन त्यांच्या वडिलांची पूर्णवेळ काळजी घेणार होते. सुमित यांच्या वडिलांच्या मित्राने सांगितले की,"कॅप्टन सभरवाल सर्वांना आशीर्वाद द्यायचा. त्याने नेहमीच एकमेकांशी संपर्क ठेवला होता, आम्हाला कधीच कळले नाही की तो इतके मोठे कॅप्टन आहेत. तो कितीही व्यस्त असला तरी, जेव्हा तो सुट्टीवर मुंबईला येत असत तेव्हा तो दररोज संध्याकाळी त्याच्या वडिलांना फिरायला घेऊन जात असत. विमानात चढण्याच्या ४८ तास आधी सुमित आम्हाला भेटला होता. दुसऱ्या दिवशी त्याचे वडील एकटे फिरताना दिसले तेव्हा आम्ही कॅप्टन सभरवाल कुठेय असे विचारले, तेव्हा त्याच्या वडिलांनी तो विमान उडवायला गेला आहे आणि लवकरच परत येईल असं म्हटलं." 

टॅग्स :विमान दुर्घटनामुंबईअहमदाबादएअर इंडिया