दिशा सॅलियन एसआयटीप्रकरणी आदित्य ठाकरेंचा सरकारवर हाल्लाबोल, म्हणाले...

By मनोहर कुंभेजकर | Published: December 10, 2023 01:33 PM2023-12-10T13:33:40+5:302023-12-10T13:34:41+5:30

Aditya Thackeray News: ज्यांची त्यांनी भीती वाटते त्यांना असा बदनाम करायचं ते काम करतात. अधिवेशन आल की असं ते वातावरण निर्माण करतात. भीती चांगली आहे. आरोप लावणे त्यांची पॉलिसी झाली आहे. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायची त्यांची सवय असल्याची टिकाही त्यांनी केली.

Aditya Thackeray lashed out at the government in the Disha Salian SIT case, said... | दिशा सॅलियन एसआयटीप्रकरणी आदित्य ठाकरेंचा सरकारवर हाल्लाबोल, म्हणाले...

दिशा सॅलियन एसआयटीप्रकरणी आदित्य ठाकरेंचा सरकारवर हाल्लाबोल, म्हणाले...

- मनोहर कुंभेजकर
मुंबई -  दिशा सॅलियन  एसआयटीप्रकरणी युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरेंनी  सरकारवर हाल्लाबोल केला. ज्यांची त्यांना भीती वाटते त्यांना बदनाम करण्याचा डाव असल्याची टिका त्यांनी केली. ज्यांची त्यांनी भीती वाटते त्यांना असा बदनाम करायचं ते काम करतात. अधिवेशन आल की असं ते वातावरण निर्माण करतात. भीती चांगली आहे. आरोप लावणे त्यांची पॉलिसी झाली आहे. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायची त्यांची सवय असल्याची टिकाही त्यांनी केली. याशिवाय सरकार यंत्रणेचा गैरवापर करत असल्याची आरोपही ठाकरेंनी केला. हे सरकार 31 डिसेंबरला पडणार असल्याची भविष्यवाणीही त्यांनी केली.

युवासेना कार्यकारणी सदस्य अंकीत सुनील प्रभू यांनी युवासेनेतर्फे 'स्वेट ऑन स्ट्रीट' या  कार्यक्रमाचे आयोजन  दिंडोशी नागरीं निवारा समोर असलेल्या रहेजा हाईट्स ते रहेजा गार्डन हा सुमारे एक किलोमीटरच्या रस्त्यावर आज सकाळी 7 ते 11 या वेळेत आयोजन केले होते.यावेळी आदित्य ठाकरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी मनमोकळे पणाने संवाद साधला.यावेळी शिवसेना नेते,स्थानिक आमदार,माजी महापौर सुनील प्रभू उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले की,  सरकारकडून यंञणेचा गैरवापर होत असून हे घटनाबाह्या सरकार आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या एफडी नक्कीच वाढवले असतील. पण घाबरू नका 31 डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणारच अशी भविष्यवाणी त्यांनी केली.

महाराष्ट्राची लूट सुरू आहे.मुंबईतले दहिसर ,वरळी आणि इतर असे अनेक प्रकल्प प्रलंबित राहिले आहेत हे सरकार आणि प्रशासन आम्हाला उत्तर देत नसून ते दिल्लीला उत्तर देत आहेत. पालिकेला आम्ही प्रश्न विचारते मात्र ते उत्तर देत नाही. हा मुद्दा आम्ही अधिवेशनात घेऊ, पुढील लढाई कोर्टात नेऊ. आमचं सरकार असताना प्रत्येक प्रकल्प संदर्भात प्रत्येक एजन्सीला घेऊन आम्ही बसायचो चर्चा करायचो, प्रत्यक्षात जाऊन कामाची पाहणी करायचो. ऑक्टोबरच्या आसपास वरळी शिवडी कनेक्टर व्हायला हवा होता. मात्र अजून झाला नाही, असे अनेक प्रकल्प आहेत .जे लवकर पूर्ण होणार होते मात्र या सरकारचे लक्ष नाही. खोक्यांसाठी अनेक प्रकल्प लेट केले जात असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.

 ज्यांची त्यांनी भीती वाटते त्यांना असा बदनाम करायचं ते काम करतात. अधिवेशन आल की असं ते वातावरण निर्माण करतात. भीती चांगली आहे. आरोप लावणे त्यांची पॉलिसी झाली आहे. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायची त्यांची सवय आहे.  राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले आम्ही राज्यासाठी लढू. देश विकला,मात्र मुंबई आम्ही विकू देणार नाही. आरक्षणचा  मुद्दा आहेच,मात्र रोजगार हा मोठा मुद्दा आहे. हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचं नाही गुजरातच्या हिताचे असल्याची टिका त्यांनी केली.

Web Title: Aditya Thackeray lashed out at the government in the Disha Salian SIT case, said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.