Join us  

'मुंबई पोलिसांपैकी कोणीतरी रियाला मदत करत आहे'; वकील विकास सिंह यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 2:27 PM

सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपाबाबत सर्वांचा जबाब नोंदवण्यास बिहार पोलिसांनी सुरुवात केली आहे.

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला नवे वळण आले आहे. सुशांतच्या वडील के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर (FIR Against rhea chakraborty) गंभीर आरोप करत गुन्हा नोंदवला आहे. यानंतर बुधवारी बिहारमधून चार पोलिसांचं पथक मुंबईत दाखल झालं होते. सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपाबाबत सर्वांचा जबाब नोंदवण्यास बिहार पोलिसांनी सुरुवात केली आहे. यानंतर आता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी नवीन माहिती समोर येत आहे. यासंबंधी बोलताना सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी मुंबई पोलिसांवरच आता आरोप केले आहे.

विकास सिंह यांनी पीटीआयशी बोलताना म्हणाले की, रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तिने तर सीबीआय चौकशीसाठीही याचिका दाखल करायला हवी होती, असं विकास सिंह यांनी सांगितले. तसेच पटणामध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर तिने आता मुंबईत सुनावणीची मागणी केली. यासोबतच हे संपूर्ण प्रकरण मुंबई पोलिसांकडे देण्याची याचिकाही दाखल केली. त्यामुळे अजून कोणता पुरावा हवा ज्यावरून कळेल की मुंबई पोलिसांमधून कोणीतरी तिला मदत करत आहे, असं विकास सिंह यांनी सांगितले आहे.

तत्पूर्वी, तत्पूर्वी, गोरेगाव येथील अंकिताच्या राहत्या घरी बिहार पोलिसांनी भेट देत तिचा जबाब नोंदवला. यावेळी सुशांतची गर्लफ्रेंड रिया ही त्याला खूप त्रास द्यायची, याबाबत सुशांतने स्वत: तिला सांगितलं, असं अंकिताने बिहार पोलिसांना सांगितलं असल्याची माहिती समोर आली आहे. मणिकर्णिका चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सुशांतने आपल्याला फोन केला होता. यावेळी त्याने माझं अभिनंदन केलं. त्यानंतर तो रिया बद्दल बोलत होता. रिया मला खूप त्रास देते. तिच्या सोबतच्या रिलेशनमध्ये मला रहायचं नाही. मला तिच्या पासून दूर व्हायचं आहे. मला काही सुचत नाही, असं सुशांतच म्हणणं होतं,  अशी माहिती अंकिताने पोलिसांना दिली. त्यामुळे आता अंकिताच्या या जबाबानंतर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला नवं वळणं येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी बिहारच्या पाटण्यातील राजीवनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रिया चक्रवर्तीसह इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरिंडा, श्रुती मोदी आणि इतरांविरोधात फसवूणक, दगाबाजी, ओलीस ठेवणे आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. सुशांतच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, "या कटात रिया आणि तिच्या कुटुंबातील इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती यांनी माझ्या मुलासोबत जवळीक वाढवली होती आणि हे सगळेच माझ्या मुलाच्या प्रत्येक बाबत हस्तक्षेप करायला लागले. तसंच सुशांत ज्या घरात राहत होता तिथे भूत-प्रेत असल्याचं सागंत त्याला ते सोडायला लावलं, असा आरोप सुशांतच्या वडिलांनी रियावर केला आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेक लोकांनी, संघटनांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत व्हावा अशी मागणी केली होती. मात्र मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सक्षम असून सीबीआय तपासाची गरज नसल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्प्ट केलं. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अनेकांचा जबाब नोंदवला असून यापुढेही अनेकांची चौकशी केली जाणार आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतमुंबई पोलीसगुन्हा अन्वेषण विभागमहाराष्ट्ररिया चक्रवर्ती