६७ जणांचा आज फैसला

By Admin | Updated: May 16, 2014 01:16 IST2014-05-16T01:16:37+5:302014-05-16T01:16:37+5:30

ठाणे, कल्याण, पालघर आणि भिवंडी या चार मतदारसंघांंतील मतदारांनी कुणाच्या पारड्यात मते टाकली,याचा फैसला उद्या होणार आहे़.

67 people decide today | ६७ जणांचा आज फैसला

६७ जणांचा आज फैसला

नारायण जाधव, ठाणे - जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, पालघर आणि भिवंडी या चार मतदारसंघांंतील आठ हजार ४५ मतदान केंद्रांंत गेल्या २४ एप्रिलला झालेल्या मतदानाच्या दिवशी ३७ लाख ५८ हजार ३०२ मतदारांनी कुणाच्या पारड्यात मते टाकली, याचा फैसला उद्या होणार आहे़ ‘नोटा’चा अधिकार किती मतदारांनी वापरला, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़ ठाणे मतदारसंघातून विद्यमान खासदार राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांच्यासह शिवसेनेचे राजन विचारे, मनसेचे अभिजित पानसे, आपचे संजीव साने, धर्मराज्यचे नितीन देशपांडे यांच्यासह २६ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. कल्याणमधून विद्यमान खासदार राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे, शिवसेनेचे डॉ़ श्रीकांत शिंदे, मनसेचे राजू पाटील, आपचे नरेश ठाकूर, बसपाचे दयानंद किरतकर मैदानात आहेत़ पालघरमध्ये विद्यमान खासदार आणि बविआ-काँगे्रस आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव, भाजपाचे चिंतामण वणगा, सीपीएमचे लाडक्या खरपडे यांचे राजकीय भवितव्य उघड होणार आहे, तर भिवंडीमध्ये भाजपाचे कपिल पाटील, काँगे्रसचे विश्वनाथ पाटील, मनसेचे सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे, आपचे जलालउद्दीन अन्सारी, सीपीआयचे मधुकर पाटील नशीब आजमावत आहेत़ यात सर्वात जास्त ठाणे मतदारसंघात २६ तर पालघरमध्ये सर्वात कमी १० उमेदवारांनी निवडणूक लढवली आहे़ यामुळे पालघर मतदारसंघाचा निकाल आधी लागण्याची शक्यता आहे. या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले असून प्रत्येकाला काय होणार, याची उत्सुकता आहे.

Web Title: 67 people decide today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.