Join us

स्वामी ओम नसतानाही बिग बॉसच्या घरात झाला पुन्हा राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 14:22 IST

बिग बॉसचा हा सिझन बºयाच कारणांनी स्मरणात राहणारा असला तरी ‘स्वामी ओम’ हे कॅरेक्टर प्रेक्षक कधीच विसरणार नाहीत. कारण जेवढे दिवस ते बिग बॉसच्या घरात होते तेवढे दिवस प्रेक्षकांना त्यांच्या करामती बघावयास मिळाल्या. केवळ शिवीगाळच नाही, तर हाणामारीपर्यंत त्यांचा घरात प्रवास राहिला आहे. याच कारणांमुळे जेव्हा त्यांची बिग बॉसने हकालपट्टी केली तेव्हा घरात काहीसी शांतता निर्माण झाली होती. मात्र ही शांतता क्षणभंगूर ठरली असून, बिग बॉसच्या घरात हाणामारीचा सिलसिला अजूनही सुरूच आहे. विशेष म्हणजे स्वामी ओम नसताना हा राडा झाल्याने प्रेक्षक आश्चर्यचकीत झाले नसतील तरच नवल.

बिग बॉसचा हा सिझन बºयाच कारणांनी स्मरणात राहणारा असला तरी ‘स्वामी ओम’ हे कॅरेक्टर प्रेक्षक कधीच विसरणार नाहीत. कारण जेवढे दिवस ते बिग बॉसच्या घरात होते तेवढे दिवस प्रेक्षकांना त्यांच्या करामती बघावयास मिळाल्या. केवळ शिवीगाळच नाही, तर हाणामारीपर्यंत त्यांचा घरात प्रवास राहिला आहे. याच कारणांमुळे जेव्हा त्यांची बिग बॉसने हकालपट्टी केली तेव्हा घरात काहीसी शांतता निर्माण झाली होती. मात्र ही शांतता क्षणभंगूर ठरली असून, बिग बॉसच्या घरात हाणामारीचा सिलसिला अजूनही सुरूच आहे. विशेष म्हणजे स्वामी ओम नसताना हा राडा झाल्याने प्रेक्षक आश्चर्यचकीत झाले नसतील तरच नवल.  त्याचे झाले असे की, बिग बॉसने घरवाल्यांना लग्झरी बजेटसाठी ‘कॉल सेंटर’ नावाचा टास्क दिला होता. या टास्कनुसार तीन-तीन सदस्यांचे गट केले होते. पहिला गट बानी जे, रोहन मेहरा आणि नीतिभा कौल यांचा होता, तर दुसºया गटात मनवीर गुर्जर, मनू पंजाबी आणि लोपामुद्रा राऊत होते. या कार्याची संचालक म्हणून मोनालिसाला जबाबदारी दिली होती. या कार्यात सुरुवातीला एक गट ग्राहकांच्या भूमिकेत दुसºया गटातील कॉल सेंटरवाल्यांना कॉल करून त्यांच्या मनातील खोचक प्रश्न विचारताना दिसला. अर्थातच यामध्ये घरात आपल्या विरोधात भूमिका घेणाºयांना हे प्रश्न विचारले जात होते. सुरुवातीला रोहन मेहरा याने मनू पंजाबीला कॉल करून त्याचे उणेदुणे काढले. त्यानंतर नीतिभा कौल हिने मनवीरला कॉल करून आपली मैत्री तोडण्यास तूच कारणीभूत असल्याचा त्याच्यावर ठपका ठेवला. मात्र खरी गंमत तेव्हा आली जेव्हा बानीने लोपामुद्राला कॉल करून तिच्यावर पर्सनल कॉमेण्ट््स करीत भडास काढली. खासगी आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारून तिला डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र लोपाने अतिशय संयमाने तिच्या सर्व प्रश्नांना बगल दिली. मात्र सुरुवातीपासूनच दोघींमध्ये जबरदस्त वैर असल्याने त्यांचा हा वाद एवढ्यावरच थांबला नाही.}}}} ">http://जेव्हा दुसºया दिवशी पहिला गट म्हणजेच बानी जे, रोहन मेहरा आणि नीतिभा कौल यांना कॉल सेंटरवाल्यांची भूमिका साकारावी लागली तेव्हा मात्र लोपामुद्राने बानीला डिवचण्याची एकही संधी सोडली नाही. ग्राहकाच्या भूमिकेत तिने बानीला कॉल करून उलट-सुलट प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. बानीनेदेखील त्या प्रश्नांचे उत्तर टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र खरी गंमत तेव्हा आली जेव्हा लोपाने बानीला तिच्या आईविषयी प्रश्न विचारला. बस्स... याच कारणाने बानीचा पारा चढला. तिने हातातील फोनची तोडफोड करून थेट लोपाचे दिशेने धाव घेतली. }}}} ">http://सुरुवातीला दोघींमध्ये तू-तू मंै-मैं झाली. त्यानंतर मात्र हा वाद आणखी चिघळला. बघता-बघता दोघीही हाणामारी करायला लागल्या. बानीने लोपाला धक्के देत तिला घट्ट मिठीत पकडले. लोपानेदेखील तिच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला. दोघींमधील वाद वाढत असतानाच मनू आणि मनवीरने मध्यस्थी करीत हा वाद सोडविला, परंतु यामुळे दोघींमधील दुश्मनी आणखी वाढल्याने पुढील काळात याचे काय परिणाम दिसतील हे सांगणे मुश्किल आहे. त्याचबरोबर दोघींच्या या वादावर आता बिग बॉस आणि ‘वीकेण्ड का वॉर’ या एपिसोडमध्ये सलमान काय भूमिका घेणार हे बघणे मजेशीर ठरेल.