Join us  

शुभमंगल सावधान..! मुक्ता-सागरचा थाटामाटात पार पडला विवाह सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 5:47 PM

Premachi Goshta Serial : हो नाही म्हणता म्हणता अखेर 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ता आणि सागर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेचं कथानक आणि पात्र सुरूवातीपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. दरम्यान आता मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. कारण या मालिकेतील विरुद्ध दिशेला तोंडं असणारे मुक्ता आणि सागर लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांच्या लग्नात सागरची पहिली पत्नी सावनी काही गोंधळ घालते का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.  

हो नाही म्हणता म्हणता अखेर प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता आणि सागर लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. खरेतर दोघांचे स्वभाव भिन्न असले तरी या दोघांना जोडणारा एकमेव धागा म्हणजे सई. सईवरच्या प्रेमापोटी या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लवकरच तो पूर्णत्वासही जाणार आहे. 

गोखले कुटुंबाच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न पार पडणार असणार असलं तरी या लग्नात कोळी ठसकाही असणार आहे. लग्न मंडपात वाजत-गाजत सागर आणि त्याच्या कुटुंबाचं आगमन होणार आहे. संपूर्ण कुटुंब कोळी पेहरावात दिसणार आहे. त्यामुळे लग्नात खऱ्या अर्थाने मुक्ता-सागर सोबतच दोन कुटुंबही नव्या नात्यात बांधली जाणार आहेत.

मुक्ता-सागरच्या लग्नासाठी ठरलं तर मग मालिकेतले अर्जुन-सायली लावली खास हजेरी लावणार आहेत. यासोबतच लग्नात सावनीची देखील एण्ट्री होणार आहे. सावनीच्या येण्याने बराच ड्रामाही रंगणार आहे. त्यामुळे लग्न निर्विघ्नपणे पार पडणार का? याची उत्सुकता नक्कीच असेल. त्यामुळे मालिकेचा आगामी भाग पाहावा लागेल.