Join us  

करणवीर शर्माच्या भावी सासऱ्यांना मिळेल 'ह्या' गोष्टीची शाश्वता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 6:12 PM

सोनी सबच्या 'मंगलम दंगलम' या मालिकेतील नायक करणवीर शर्मा सध्या या मालिकेत सासरेबुवांचे मन जिंकण्याचे प्रयत्न करत आहे.

सोनी सबच्या 'मंगलम दंगलम' या मालिकेतील नायक करणवीर शर्मा सध्या या मालिकेत सासरेबुवांचे मन जिंकण्याचे प्रयत्न करत आहे. आपल्या खऱ्याखुऱ्या भावी सासरेबुवांसोबत कसे संबंध असतील, यावरही त्याने मत मांडले. या मालिकेत त्याला ज्या मुलीशी लग्न करायचे आहे तिचे वडील (मनोज जोशी) जरा अतीच काळजी घेणारे आहेत. मात्र, त्यांना इम्प्रेस करण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

अशी परिस्थिती खऱ्या आयुष्यात उद्भवली तर काय यावर उपाय म्हणून करणवीरने स्क्रीनवरील भूमिकेतूनच काही युक्त्या निवडल्या आहेत. आपल्यामध्ये सुयोग्य जावयाचे गुण आहेत त्यामुळे भावी सासऱ्यासोबतचे संबंध चांगले असतील, असा आत्मविश्वास त्याला आहे. करणवीर शर्मा म्हणाला,' मला वाटते कोणताही पिता आपल्या मुलीसाठी सुयोग्य घराणे, भावी जावयाचे स्वावलंबी असणे अशा गोष्टी पाहिल्या. मी तर वयाच्या १६व्या वर्षापासून काम करतोय अगदी आजवर. माझा पहिला पगार नेहमी मी आईलाच देतो. मला वाटते, स्वत:शी प्रामाणिक असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी मुलीच्या घरच्यांचे मन जिंकून घेणे फारसे कठीण नाही.'तो पुढे म्हणाला, 'त्यांच्या मुलीचे कायम मनोरंजन होत राहील आणि तिला स्वयंपाकाची चिंता करावी लागणार नाही, याची माझ्या भावी सासऱ्यांना अगदी शाश्वतीच देता येईल. कारण, विनोद करण्यात मी पटाईत आहेच आणि स्वयंघोषित शेफही आहे.' करणवीर मानवतावादीही आहे. तो अनेक एनजीओसोबत काम करतो. शिवाय, स्वच्छ भारत आणि मुलींच्या शिक्षणाच्या मोहिमेलाही त्याने पाठिंबा दिला आहे.  

टॅग्स :मंगलम दंगलम