Join us  

‘सख्या रे’ मालिकेमध्ये तुफान सोडवणार गुंता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2017 1:17 PM

'सख्या रे' या मालिकेमध्ये अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत. नुकतीच सिद्धेश्वरीची एन्ट्री झाली आहे ती वाड्यामध्ये येण्यामागचा हेतू अजून ...

'सख्या रे' या मालिकेमध्ये अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत. नुकतीच सिद्धेश्वरीची एन्ट्री झाली आहे ती वाड्यामध्ये येण्यामागचा हेतू अजून कोणालाच कळलेला नाही. त्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून समीर आणि वैदेहिच्या मनात असलेली इच्छा म्हणजे लग्न तेही देखील पूर्ण होण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे. कारण लवकरच मालिकेमध्ये समीर आणि वैदेहीचा साखरपुडा होणार आहे. पण आता हा साखरपुडा निर्विघ्नपणे पार होणार कि नाही? कुठल्या साखरपुड्यामध्ये कुठल्या अडचणी येतील ? हे सगळ तुम्हाला मालिका बघितल्यावरच कळणार आहे.साखरपुड्याला वैदेही बरोबर पहिल्यांदाच समीरची भेट प्रियंवदाशी होणार आहे. या दोघांची भेट झाल्यावर पुढे काय होईल हे बघणे नक्कीच रंजक असणार आहे. समीर आणि रणविजयचा चेहरा सारखा आहे त्यामुळे प्रियंवदाच्या मनात शंका आहे कि हा मुलगा समीर आहे कि रणविजय. पण आता हि शंका दूर होणार आहे. हि शंका दूर करण्यास तुफान तिची मदत करणार आहे. तुफान म्हणजे माणूस नसून हा रणविजयचा लाडका घोडा आहे, जो त्याच्या खूप जवळचा आहे रणविजयचे तुफानवर जीवापाड प्रेम आहे. तुफान रणविजयने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकतो. जेंव्हा साखरपुड्याच्या दिवशी प्रियंवदा समीरला बघते तेंव्हा रणविजयने सांगितलेली एक गोष्ट तिला आठवते रणविजयने तिला सांगितलेले असते कि, “माझ्याव्यतिरिक्त दुसरी कुणीही व्यक्ती तुफानवर बसूच शकत नाही. हे आठवताच ती ठरवते कि आता हाच पर्याय आहे हे जाणून घ्यायचा कि हा मुलगा समीर आहे कि रणविजय. तुफान (घोडा) बरोबर चित्रीकरण करणाचा अनुभव विचारल्यास सुयश म्हणाला, “प्रत्येक प्राण्याशी एक नातं निर्माण करणं खूप गरजेच असत.माझा हा पहिलाच अनुभव होता मी नक्कीच घाबरलो नव्हतो पण एका  प्रकारच दडपण आणि आव्हान नक्कीच होतं. कारण तुफान हा घोडा रणविजयाच्या खूपच जवळचा आणि ते स्क्रीनवर दाखवायचं म्हणजे तस नातं निर्माण करण खूप महत्वाच होतं, तुफान आणि माझ्यात ते नातं निर्माण देखील झालं त्यामुळे प्रेक्षकांना ते लवकरच दिसेल. इतक नक्की सांगेन तुफान बरोबर चित्रीकरण करायला खूपच मजा आली”.आता हे सगळ बघण रंजक असणार आहे.