Join us  

पाठक बाईंना निवडणुकीसाठी मिळणार शुभचिंतकाचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 11:39 AM

राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने नुकताच ६०० भागांचा टप्पा पार केला आहे.

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने नुकताच ६०० भागांचा टप्पा पार केला आहे. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या आहेत आणि त्या तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत.

नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि अंजलीचं नाव आबासाहेब सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी पुढे करतात. या निवडणुकीसाठी नंदिताला उभं राहायचं पण घरातील सगळ्यांचा आणि गावकऱ्यांचा पाठिंबा हा अंजलीलाच मिळतोय हे पाहून नंदिता अजून खवळते आणि अपक्ष राहून निवडणुकीला उभं राहायचा निर्णय घेते. त्यात ती राणाकडून फक्त तिलाच पाठिंबा द्यायचं वचन देखील घेते. राणा वचनबद्ध असल्यामुळे उघड उघडपणे अंजलीला पाठींबा देऊ शकत नाही आहे, म्हणून तो आणि बरकत मिळून रात्रीच्यावेळी गावच्या भिंतींवर अंजलीच्या प्रचाराचे नारे लिहितात. राणा हे सगळं अंजलीचा शुभचिंतक म्हणून करतोय. पण अंजलीला कळेल का तिचा हा हितचिंतक कोण आहे ते? या सगळ्या रंजक घडामोडी आगामी भागात रसिकांना पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :तुझ्यात जीव रंगलाअक्षया देवधर