Join us  

अभिनेता इम्रान खानला या कारणामुळे करावी लागतेय तारेवरची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 6:30 AM

गेली दोन दशके हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिका यांच्यात आपल्या अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविलेला अभिनेता इम्रान खान आता टीव्ही मालिकांबरोबरच रंगभूमीवरही भूमिका साकारीत आहे.

उत्कंठापूर्ण कथानक आणि संगीता घोष, नीरा बॅनर्जी, सना सय्यद, इम्रान खान यांच्यासारख्या नामवंत कलाकारांच्या अप्रतिम अभिनयामुळे स्टार प्लस वाहिनीवरील ‘दिव्य दृष्टी’ या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. गेली दोन दशके हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिका यांच्यात आपल्या अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविलेला अभिनेता इम्रान खान आता टीव्ही मालिकांबरोबरच रंगभूमीवरही भूमिका साकारीत आहे.

दिव्य दृष्टी’ या मालिकेत बॅरीची भूमिका रंगविणारा इम्रान खान रंगभूमीबद्दल म्हणतो, “रंगभूमी ही अभिनयाची शाळा असून त्यात तुम्हाला खूप काही शिकायला मिळते. त्यामुळे आता अधिक उशीर होऊ नये, म्हणून मी रंगभूमीवरहीभूमिका साकारण्याचा निर्णय घेतला आहे.” तो पुढे सांगतो की, “अर्थात टीव्ही मालिकांतील भूमिकांवरील माझे प्रेम हे अमर्याद असल्यानेच मी ‘दिव्य दृष्टी’तील ही भूमिका स्वीकारली. या मालिकेची संकल्पना खरोखरच आकर्षक असून त्यातील माझी भूमिकाही तितकीच उत्सुकतापूर्ण आहे. माझी बॅरीची व्यक्तिरेखा ही तशी नकारात्मकच असली, तरी त्याला विनोदाची झालर असल्याने ती तशी आव्हानात्मकच म्हटली पाहिजे. त्यामुळेच मी ही भूमिका स्वीकारली.”रंगभूमीवरील प्रेमापोटी तिथे भूमिका साकारीत असतानाच आपल्या मूळ आणि आवडत्या टीव्हीच्या माध्यमातही आपला अभिनय करण्याचे काम सुरू ठेवणाऱ्या इम्रान खानचे कौतुकच करावे लागेल. 

टॅग्स :दिव्य दृष्टीस्टार प्लस