Join us  

2020 मध्ये होऊ शकतं आलिया-रणबीरचं लग्न? जवळच्या मित्राकडून खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:51 PM

दोघांच्या लग्नाबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहे. अशात त्यांच्या एका जवळच्या मित्राने त्यांच्या लग्नाबाबत एक खुलासा केलाय.

मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या जोड्यांच्या लग्नाची चर्चा जोरदार रंगली आहे. एकीकडे दीपिका पादकोन आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची चर्चा सुरु असतानाच अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नावरही चर्चा केली जात आहे. दोघांच्या लग्नाबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहे. अशात त्यांच्या एका जवळच्या मित्राने त्यांच्या लग्नाबाबत एक खुलासा केलाय.

काही दिवसांपूर्वीच ट्विटरवर रणबीरला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने लवकरच असे उत्तर देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, आलिया-रणबीरच्या एका मित्राने सांगितले की, आलिया आणि रणबीर 2020 च्या आधी लग्न करणार नाहीत किंवा 2020 मध्ये करु शकतात. 

त्यांच्या मित्राने सांगितले की, आलिया आणि रणबीर हे दोघेही आपल्या करिअरच्या योग्य वळणावर आहेत. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. दोघेही एकमेकांबाबत श्योअर आहे. दोघेही लग्न करणार आहेत पण हे लग्न 2020 आधी होणार नाही. म्हणजे 2020 मध्ये दोघेही लग्न बंधनात अडकू शकतात.

दोन महिन्यांपूर्वी आलिया आणि रणबीरने आपल्या नात्याबाबत खुलेपणाने सांगितले होते. तेव्हापासूनच दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु होत आहे. आता हे दोघे खरंच लग्न करणार आहेत की, या केवळ अफवा आहेत हे येत्या काळात कळेलच. पण तोपर्यंत ही चर्चा सुरुच राहणार.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर