Join us  

IN PICS : बिग बींसोबतचा ‘तो’ किसींग सीन ठरला राणी मुखर्जी व अभिषेक बच्चनच्या ब्रेकअपचं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 4:05 PM

1 / 8
एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी आणि लग्नानंतर आजही बॉलिवूडमध्ये सक्रीय असलेली अभिनेत्री राणी मुखर्जी आज तिचा 44 वाढदिवस साजरा करतेय. राणीच्या प्रोफेशनल लाईफइतकीच तिच्या पर्सनल लाईफचीही झाली. अभिषेक बच्चन व राणीचं अफेअर एकेकाळी प्रचंड गाजलं होतं.
2 / 8
होय, कधीकाळी अभिषेक व राणी रिलेशनशिपमध्ये होते. करिश्मा कपूरसोबतचा साखरपुडा मोडल्यानंतर अभिषेकच्या आयुष्यात राणीची एन्ट्री झाली होती.
3 / 8
बंटी और बबली, युवा, कभी अलविदा ना कहना यासारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये एकत्र काम करता करता अभिषेक व राणी एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं म्हटलं जातं.
4 / 8
अगदी दोघं एकमेकांच्या कुटुंबालाही भेटले होते. इव्हेंटमध्ये दोघं एकत्र जाऊ लागले होते. जया बच्चन या बंगाली असल्याने होणारी सून बंगाली असावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे जया यांना राणी पसंत होती. पण पुढे जया यांच्यामुळेच राणी बच्चन कुटुंबाची सून होऊ शकली नाही,असंही म्हटलं जातं.
5 / 8
रिपोर्टनुसार जया यांना राणी आवडत होती. तिला सून बनवून घेण्यास त्या तयार होत्या. पण दरम्यानच्या काळात असं काही घडलं की, पुढचं सगळं फिस्कटललं. एका कारणानं जया बच्चन राणीवर अशा काही नाराज झाल्यात की, पुढे याच कारणामुळे राणी व अभिषेकचं ब्रेकअप झालं.
6 / 8
जया यांच्या नाराजीचं कारण होतं, राणीने अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिलेला एक किसींग सीन. होय, संजय लीला भन्साळी यांच्या ‘ब्लॅक’ राणी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात राणी आणि अमिताभ यांचा एक किसिंग सीन होता.
7 / 8
राणीने या सीनला नकार द्यावा, अशी जया यांची इच्छा होती. पण राणी तयार झाली आणि इथूनच सगळं बिनसलं. होणाऱ्या सूनेनं आपल्या होणाऱ्या सासऱ्यासोबत असा सीन दिला आणि होणाऱ्या सासूबाई नाराज झाल्या. याच कारणाने राणी आणि अभिषेक यांचं ब्रेकअप झालं.
8 / 8
या ब्रेकअपनंतर राणी व बच्चन कुटुंबातील संबंध इतके खराब झाले होते की अभिषेक व ऐश्वर्याच्या लग्नातही राणीला बोलवलं गेलं नव्हतं. यावर राणीने नाराजीही बोलून दाखवली होती. मी अभिषेकला मित्र समजायची. पण तो फक्त को-स्टार निघाला, अशी ती म्हणाली होती.
टॅग्स :राणी मुखर्जीअभिषेक बच्चनअमिताभ बच्चन