Join us  

'मिस इंडिया' स्पर्धेदरम्यान ऐश्वर्या-सुष्मितामध्ये होता कोल्ड वॉर ? सहस्पर्धकाकडून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 9:11 AM

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि सुष्मिता सेन या दोघी 1994 मध्ये 'मिस इंडिया' या सौंदर्यस्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.

अभिनेत्रींमध्ये एकमेकींबद्दल प्रचंड ईर्षा, द्वेष आणि कधी कधी संघर्षसुद्धा पाहायला मिळतो. पेज-थ्री दुनियेच्या शब्दांत सांगायचं झालं तर अभिनेत्रींमध्ये जोरदार कॅटफाईट पाहायला मिळते. अभिनेत्रींमधील कॅटफाईटचे किस्से खूप जुने आहेत. श्रीदेवीपासून शिल्पा शेट्टी आणि रवीना टंडनपर्यंत.  त्यापैकी एक नाव म्हणजे मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय. बॉलीवूडच्या या दोन्ही सुंदरींनी 1994 मध्ये 'मिस इंडिया' स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी दोघींमध्ये तणाव होता का, याचा खुलासा नुकतेच सहस्पर्धकाकडून झाला आहे. 

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि सुष्मिता सेन या दोघी 1994 मध्ये 'मिस इंडिया' या सौंदर्यस्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या दोघींमध्ये सुरुवातीच्या काळात तीव्र स्पर्धा असल्याचं म्हटलं जातं. याच  'मिस इंडिया' स्पर्धेत अभिनेत्री मानिनी डेसुद्धा टॉप 10 फायनिस्टपैकी एक होती. नुकत्याच  सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत तिनं ऐश्वर्या आणि सुष्मिता यांच्यातील स्पर्धेवर भाष्य केलं.  

मानिनी म्हणाली, 'दोघींमध्ये असा कोणताच वाद नव्हता. मीडियाने तसं वातावरण निर्माण केलं होतं. आम्ही विशीत होतो आणि त्या दोघीही एकमेकींशी आदरपूर्वक वागायच्या. त्यावेळी सुष्मिताची फारशी चर्चा नव्हती. ऐश्वर्या आधीपासूनच एका नामांकित साबणाच्या ब्रँडची मॉडेल असल्याचं आम्हाला सांगितलं गेलं होतं. त्यामुळे आम्ही त्या स्पर्धेत तिला काय टक्कर देणार असं वाटलं होतं. माझ्यासमोर त्यांच्यात कधीही मतभेद झाले नाहीत'.

यावेळी मानिनी हिनं सुष्मिता सेनचे आभार मानले. ती म्हणाली, 'मी सुष्मिता सेनचे आभार मानू इच्छिते, कारण मी तिला मिस इंडिया स्पर्धेच्या आधी भेटले होते.  ती त्यावेळी माझ्या माजी पतीसोबत काम करत होती, तिने माझा हात धरला आणि मला स्पर्धेचा फॉर्म भरण्यासाठी धीर दिला.  1994 मध्ये मिस इंडियाचा शेवटचा फॉर्म भरणारी मीच होती. तिथूनच माझा प्रवास सुरू झाला'. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनसुश्मिता सेनसेलिब्रिटी