Join us  

पतीच्या निधनानंतर इतकं बदलेलं मंदिरा बेदीचं आयुष्य, म्हणाली- 'आता मी..'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 12:43 PM

मंदिरा बेदीचे पती दिग्दर्शक राज कौशल यांचे 2021 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर सिंगल मदर म्हणून आपल्या दोन मुलांचा संभाळ करते आहे.

मंदिरा बेदी (Mandira Bedi)ने बॉलिवूडपासून क्रिकेटपर्यंत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही काळ इंडस्ट्रीपासून दूर राहून मंदिरा बेदीने २०२३ ची दमदार सुरुवात केली आहे. दीर्घकाळानंतर मंदिरा क्रिकेटच्या रिअ‍ॅलिटी शोमधून पुनरागमन करत आहे. ती लवकरच 'क्रिकेट का टिकट' हा रिअ‍ॅलिटी शो होस्ट करणार आहे. एका मुलाखतीत या अभिनेत्रीने तिच्या नवीन प्रोजेक्ट्सबद्दल तसेच तिच्या पतीच्या निधनानंतरच्या आयुष्याबद्दल सांगितले.

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मंदिरा बेदी म्हणाली, “२०२३ माझ्यासाठी खूप आशादायक आहे. मी 'क्रिकेट का टिकट'ने नवीन वर्षाची सुरुवात करत आहे. त्यानंतर अजून बरेच प्रोजेक्ट आहेत. मी काही स्क्रिप्ट्स देखील वाचते आहे. मला नवीन सुरुवात करायला आवडते आहे. या वर्षी मी एक नवीन सुरुवात करणार आहे."

मंदिरा बेदी पुढे म्हणाली, “हा रिअ‍ॅलिटी शो स्त्री आणि पुरुष दोघांचा आहे. हा एक वेगळ्या प्रकारचा शो आहे, असा शो याआधी कधीच झाला नव्हता. मी केलेल्या लाइव्ह टेलिकास्टपेक्षा हे खूप वेगळे आहे, म्हणूनच मी त्याचा एक भाग होण्यासाठी खूप उत्सुक आहे.

पती गेल्यानंतर आयुष्य बदललेमंदिरा बेदीचे पती दिग्दर्शक राज कौशल यांचे 2021 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राज कौशलने 'प्यार में कभी कभी', 'शादी का लड्डू' सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. मंदिरा बेदीने 1999 मध्ये राज कौशलशी लग्न केले. पतीच्या मृत्यूबद्दल बोलताना ती म्हणते, “माझं आयुष्य बदललं आहे. गेल्या दोन वर्षांत माझ्याकडे खंबीर होण्याशिवाय पर्याय नव्हता. आता मी पूर्वीपेक्षा जास्त सशक्त झाले आहे.” 

टॅग्स :मंदिरा बेदी