Join us  

अनुराग कश्यपसोबत घटस्फोट झाल्यानंतर कल्कीची अशी झाली होती अवस्था, म्हणाली- यातून बाहेर पडण्यासाठी...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 1:50 PM

कल्कीने 2011 मध्ये चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपशी लग्न केले. पण, 2015 मध्ये त्यांचे रस्ते मार्ग वेगळे झाले.

'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्री कल्की कोचलीन (Kalki Koechlin) तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत राहिली. काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत तिने घटस्फोट, लग्न न करतात आई होणं या सर्व गोष्टींवर चर्चा केली. यावेळी तिने मुलाखतीत कल्की पूर्वाश्रमीचा पती अनुराग कश्यपसोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला.

कल्कीने 2011 मध्ये चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपशी लग्न केले. पण, 2015 मध्ये त्यांचे रस्ते मार्ग वेगळे झाले आणि त्यांचा घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर कल्की मानसिकरित्या खचली होती. स्वत:ला सावरण्यासाठी त्याला थेरपीचा आधारा घ्यावा लागला. अलीकडेच तिने अनुरागपासून घटस्फोट घेतल्यानंतर स्वतःला कसे पुन्हा उभं केलं यावर भाष्य केलं.

अनुरागसोबतच्या घटस्फोटा बोलताना कल्की म्हणाली की, तिला यातून बाहेर पडण्यासाठी खूप वेळ लागला. घटस्फोटानंतर पहिली काही वर्षे तिची आणि अनुरागचं संबंध फारसे काही चांगलं नव्हते, असा खुलासाही अभिनेत्रीने केला. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान कल्कीने खुलासा केला की तिने आणि अनुरागने  वेळ घेतला. इतकेच नाही तर कल्कीने सांगितले की, तिला विविध थेरपीही कराव्या लागल्या. अभिनेत्री पुढे म्हणाली की घटस्फोट होऊन आता सात-आठ वर्षे झाली आहेत. आज तिच्या आणि अनुरागमध्ये चांगली मैत्री झाली आहे. 

कल्कीने 2009 मध्ये अनुराग कश्यपच्या 'देव-डी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात अभय देओलही मुख्य भूमिकेत होता. याशिवाय कल्कीने 2010 मध्ये अनुरागसोबत 'दॅट गर्ल इन येलो बूट्स' आणि 'सेक्रेड गेम्स सीझन 2'मध्येही काम केले होते. 

टॅग्स :अनुराग कश्यपकल्की कोचलीन