‘झाला बोभाटा’ हा चित्रपट एका गावावर चित्रित करण्यात आला आहे. आता गाव आलं की बारा भानगडी आल्या आणि त्यात ती मान्याची वाडी तर अग्रेसरच म्हणा. मान्याची वाडी फक्त आदर्श गाव पुरस्कार असला की नटते-सजते, सोहळा संपला की मात्र जैसे थे. भ्रष्टाचार, स्वच्छता, पाणीटंचाई, दारूबंदी अशा अनेक प्रश्नांना कंटाळून गेलेले हे गावकरी. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी गावकरी पुन्हा एकत्र येतात, नेमकी काय भानगड आहे हे कळण्यासाठी प्रेक्षकांना 'झाला बोभाटा' हा चित्रपट पाहावा लागणार असल्याचे दिग्दर्शक अनुप जगदाळे याने ‘लोकमत’ आॅफिसमध्ये सांगितले.
‘झाला बोभाटा’
By admin | Updated: January 7, 2017 02:22 IST