Join us  

हे असणार विराट-अनुष्काच्या साखरपुड्याचे मुख्य आकर्षण ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2016 12:49 PM

टीम इंडियाचा यशस्वी टेस्ट कॅप्टन,बॉलिवुडची आरफा तर एक बॉलिवुडचा बर्फी. या तिघांमध्ये आहे खास कनेक्शन.टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन विराट ...

टीम इंडियाचा यशस्वी टेस्ट कॅप्टन,बॉलिवुडची आरफा तर एक बॉलिवुडचा बर्फी. या तिघांमध्ये आहे खास कनेक्शन.टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन विराट कोहली,बॉलिवुडची अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि बॉलिवूडचा रॉकस्टार आणि बर्फी अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे रणबीर कपूर.या तिघांमध्ये खास कनेक्शन आहे. विराट कोहली आणि अनुष्काची रियल लव्ह-स्टोरी जगजाहिर आहे.चोरी चोरी चुपके चुपके एकमेंकांवर प्रेम करणा-या या लवबर्ड्सचा लवकरच साखरपुडा होणार असल्याचे कळतंय.त्यामुळेच त्यांच्या या मच-अवेटेड साखरपुड्याला येणा-या पाहुण्यांची यादी समोर येऊ लागली आहे. या पाहुण्यांच्या यादीत खास नाव आहे ते विराट आणि अनुष्काचा खास मित्र असलेला अभिनेता रणबीर कपूरचे. रियल लाइफमध्ये विराटशी अनुष्काचे सूत जुळले आहेत. तर रिल लाइफमध्ये अनुष्का आणि रणबीरचा रोमान्सही रसिकांना भावला. 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमातील अनुष्का आणि रणबीरची केमिस्ट्री भाव खाऊन गेली.विराट आणि अनुष्काशी असलेल्या खास नात्यामुळे रणबीर त्यांच्या साखरपुड्याला आवर्जून उपस्थित राहणार आहे.कोणत्याही खासगी सोहळ्याला हजेरी न लावणारा रणबीर या साखरपुडा सोहळ्याला हजर राहणार आहे. याचे कारण आहे रणबीरचे विराट आणि अनुष्काशी असलेले खास नाते. रणबीर हा फुटबॉल आणि क्रिकेटचा फॅन आहे. त्यामुळे क्रिकेटर विराटशी त्याची चांगली मैत्री आहे. त्यातच सेलिब्रिटी आणि क्रिकेटर यांच्यात दरवर्षी चॅरिटी फुटबॉल मॅचेस खेळवण्यात येतात. या मॅचेसमध्ये रणबीर आणि विराटचा मैत्रीपूर्ण आमना सामना होता. फुटबॉलच्या मैदानात खुन्नस दाखवत खेळणारे हे दोन्ही स्टार्स मैदानाबाहेर तितकेच चांगले मित्र आहेत. त्यातच विराटचे अनुष्काशी असलेल्या खास नात्यामुळेही या रणबीर आणि अनुष्काच्या मैत्रीला नवे परिमाण लाभले. अनुष्का रणबीरची कोस्टार आहे. 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमातून रणबीर आणि अनुष्का एकत्र आले. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने रसिकांवर जादू केली. सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी आणि सिनेमानंतर या दोघांत मैत्रीचे घट्ट नातं निर्माण झाले आहे. या सगळ्या गोष्टींमुळे अनुष्का आणि विराटच्या साखरपुड्याला रणबीर आवर्जून उपस्थित राहणार आहे. याशिवाय ऐ दिल है मुश्किल सिनेमातील अनुष्काचे कोस्टारही या साखरपुडा सोहळ्यात सहभागी होणार आहेत. रणबीरसह करण जोहर, ऐश्वर्या राय बच्चनही या खास सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. एकूणच या सोहळ्याच्या निमित्ताने ऐ दिल है मुश्किलच्या टीमचे रियुनियनही होणार हे मात्र नक्की.