Join us  

जान्हवी कपूरच्या हाती कायम दिसणाऱ्या ‘त्या’ गुलाबी बाटलीचं गुपित काय?, काय आहे त्या बाटलीशी जान्हवीचं कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 11:52 AM

बॉलिवूडमध्ये सध्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूरची जोरदार चर्चा सुरु आहे. करण जोहरच्या आगामी 'धडक' सिनेमातून जान्हवीने ...

बॉलिवूडमध्ये सध्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूरची जोरदार चर्चा सुरु आहे. करण जोहरच्या आगामी 'धडक' सिनेमातून जान्हवीने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. मराठीमधील सुपरडुपर हिट सिनेमा सैराटचा रिमेक असलेल्या धडकची बॉलिवूडमध्ये जोरदार हवा आहे.या सिनेमालाही सैराटप्रमाणे यश मिळेल आणि जान्हवीचं रुपेरी पडद्यावर दणक्यात पदार्पण होईल असं बॉलिवूडमधील अनेकांना वाटत आहे.त्यामुळे प्रत्येकालाच धडक सिनेमाच्या रिलीजची प्रतिक्षा आहे. या सिनेमामुळेच जान्हवीसुद्धा साऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. ती जे काही करते त्याची आपसुकच माध्यमांकडून दखल घेतली जाते. ६५व्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात सोहळ्यात जान्हवी श्रीदेवी यांच्याप्रमाणे आपल्या वडिलांची काळजी घेत असल्याचा एक फोटो समोर आला होता. या फोटोत जान्हवी आपल्या जवळ असणाऱ्या रुमालाने वडिलांच्या डोक्यावरील घाम पुसत असल्याचे पाहायला मिळालं होतं. शिवाय या सोहळ्याप्रसंगी जान्हवीने आपल्या आईच्या खास साडी कलेक्शनमधील साडी परिधान केली होती. हीच साडी श्रीदेवी यांनी २०१२ साली टॉलिवूड अभिनेता रामचरनच्या लग्नात परिधान केली होती. आता पुन्हा एकदा कॅमेऱ्यांनी जान्हवीची खास गोष्ट टिपलीय. जान्हवी जिथे जाते तिथे तिच्यासोबत ही गोष्ट असते. ही वस्तू म्हणजे जान्हवीच्या हातात कायम दिसणारी गुलाबी रंगाची  बाटली. श्रीदेवी यांचं फेब्रुवारी महिन्यात निधन झाल्यानंतर कुठेही जाताना जान्हवी ही गुलाबी बाटली आपल्यासोबत बाळगत असल्याचे समोर आलंय. यावरुन अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. गुलाबी रंग हा जान्हवीचा आवडता रंग असेल आणि त्यामुळेच ती ही गुलाबी बाटली सोबत ठेवत असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. अन्यथा ही गुलाबी बाटली आणि श्रीदेवी यांचं काहीतरी कनेक्शन असेल. त्यामुळेच आईची आठवण म्हणून जान्हवी कायम ती बाटली स्वतःजवळ बाळगत असावी असंही बोललं जात आहे. मात्र या बाटलीचं गुपित खुद्द जान्हवीच उलगडू शकेल किंवा तिच्या निकटवर्तीयांना याची माहिती असावी.cnxoldfiles/a>अमिताभ भट्टाचार्य यांनी या गीताचे बोल लिहिले आहेत. गाण्यात ईशान व जान्हवी दोघांचाही रोमान्स वेड लावणारा आहे, तितकेच गाणेही मनात रूंजी घालणारे आहे. श्रेया आणि अजय गोगवले यांच्या आवाजाने गाण्याला सुंदर साज चढवला आहे.