Join us  

"काहीही झालं तरीही..."; घराबाहेर गोळीबार प्रकरणानंतर सलमान खान त्याच्या टीमला काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 12:56 PM

सलमान खानने गोळीबार प्रकरणानंतर त्याच्या सहकाऱ्यांना काय सांगितलं, सलमानची प्रतिक्रिया काय? याचा खुलासा झालाय (salman khan)

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या घरावर काल रविवारी पहाटे अज्ञात इसमांनी गोळीबार केला. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. मनोरंजन विश्वात खळबळ उडालीच शिवाय राजकीय वर्तुळातही या प्रकरणाची चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून राज ठाकरेंपर्यंत अनेक नेत्यांनी सलमान खानची विचारपूस केली. अशातच गोळीबार प्रकरणानंतर सलमान त्याच्या टीमला काय म्हणाला? याची प्रतिक्रिया समोर आलीय. 

इंडिया टूडेने दिलेल्या अहवालानुसार असं म्हटलं गेलंय की, सलमान अशा धमक्यांना भीत नाही. त्याने गोळीबार प्रकरणाला जास्त महत्व न देऊन दुर्लक्ष केलंय. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ठरल्याप्रमाणे आगामी प्रोजेक्टवर सलमानने लक्ष केंद्रीत केलंय. जर आपण या प्रकरणाला जास्त महत्व दिलं तर तेच त्यांना हवंय, त्यामुळे सलमान या गोष्टीकडे तितकं लक्ष देत नाहीय. मनोरंजन विश्वातील अनेक मित्र-मैत्रीणींना त्याने काळजी न करण्याचा सल्ला दिलाय. याशिवाय गॅलेक्सी अपार्टमेंटमधील इतर रहिवाश्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कोणीही घरी येऊ नये, असंही सलमान म्हणाला.

सलमान खान सध्या कोणत्याही आगामी सिनेमाचं शुटींग करत नाहीय. पण विविध ब्रँड आणि जाहीरातींच्या शुटींगमध्ये सलमान व्यस्त आहे. त्यामुळे त्याने त्याच्या टीमला आगामी कोणतेही कार्यक्रम आणि शुटींग रद्द न करायला सांगितलं आहे. आगामी वेळापत्रकाप्रमाणे जे जसं आहे तसंच होईल, असं सलमान म्हणाल्याचं सूत्रांनी सांगितलंय. दरम्यान काल रविवारी १४ एप्रिल पहाटे ५ वाजता सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराचा तपास पोलीस करत आहेत.  

टॅग्स :सलमान खानसलीम खान