Join us  

अनुष्का शर्माशिवाय विराट कोहली गेला गोव्याला ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 10:27 AM

दोन महिन्यांची साऊथ अफ्रिकेमधील सिरीज संपवून विराट कोहली भारतात परतला आहे. विराटला मुंबईत एअरपोर्टवरुन गोव्याला जाताना स्पॉट झाला आहे. ...

दोन महिन्यांची साऊथ अफ्रिकेमधील सिरीज संपवून विराट कोहली भारतात परतला आहे. विराटला मुंबईत एअरपोर्टवरुन गोव्याला जाताना स्पॉट झाला आहे. यावेळी विराट संपूर्ण काळ रंगांच्या कपड्यांमध्ये दिसला.  सध्या अनुष्का तिचा आगामी चित्रपट सुई-धाग्याच्या शूटिंगसाठी भोपाळमध्ये आहे.  विराट आणि अनुष्का डिसेंबर 2017मध्ये इटलीमध्यल्या टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतोमध्ये जाऊन गपचुप लग्न केले होते. त्यानंतर विराटसोबत अनुष्का ही साऊथ अफ्रिकेच्या टूरवर गेली होती. आठवडाभर तिकडे राहिल्यानंतर ती भारतात परतली होती. लवकरच अनुष्का वरुण धवन सोबत स्क्रिन शेअर करणार आहे. वरूण .  यात ती एका स्ववलंबी लेडीज टेलरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर वरुण धवनही टेलरची भूमिका साकारणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन शरत कटारिया करणार आहे. तर मनीष शर्मा या चित्रपटाचे प्रोड्यूसर आहेत. यापूर्वी ‘दम लगाके हईशा’मध्ये मनीष व शरत यांच्या टीमने एकत्र काम केले होते. ‘मेड इन इंडिया’च्या आयडॉलॉजीवर आधारित या चित्रपटात एक नवी कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे. वरुण धवन व अनुष्का शर्मा हे दोघे पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत.आता या दोघांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री लोकांना किती भावते, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. ‘सुई धागा’शिवाय अनुष्काचा ‘परी’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनुष्काची निर्मिती असलेला ‘परी’ एक हॉरर चित्रपट आहे. ‘परी’ होळीला प्रदर्शित केला जाणार आहे. आतापर्यंतच्या त्याच्या प्रोमोने थरकाप उडवून दिला आहे. आतापर्यंत चार शॉर्ट प्रोमो प्रदर्शित करण्यात आले असून, हे सर्वच प्रचंड भीतीदायक आहेत. अनुष्काचा तिच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गतचा हा तिसरा चित्रपट आहे. या अगोदर ‘एन. एच. १०’ आणि ‘फिल्लोरी’ या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. आता प्रेक्षकांना या हॉररपटाची प्रतीक्षा आहे.