म्हणून 'राजी' सिनेमातल्या या सीनसाठी तब्बल 175 वेळा नेसावी लागली आलियाला साडी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 13:14 IST
काळजाला भिडणारे सूर,प्रभावी सिनेमॅटोग्राफी आणि आलियासह इतर कलाकारांचा तितकाच प्रभावी अभिनय यामुळे हे गाणं तसंच त्याच्या मेकिंगचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.
म्हणून 'राजी' सिनेमातल्या या सीनसाठी तब्बल 175 वेळा नेसावी लागली आलियाला साडी!
बॉलिवूडच्या सिनेमातील मुलीच्या बिदाईची गाणी रसिकांच्या काळजाला भिडतात. ही गाणी इतकी भावनिक आणि काळजाला भिडणारी असतात की रसिकांच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं. मग ते गाणं 'दाता' सिनेमातील असो किंवा मग 'धडकन' किंवा मग 'हम आपके हैं कौन'. बऱ्याच दिवसांपासून रुपेरी पडद्यावर असं बिदाई गीत आलं नव्हतं. मात्र लवकरच रसिकांच्या काळजाला भिडणारं असंच एक गीत रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.‘मूड के ना देख दिलबरो..’ हे राजी सिनेमातील गाणं रसिकांच्या मनात घर करण्यासाठी येत आहे.लग्नानंतर लेक माहेर सोडताना तिच्या पित्याची होणारी तगमग आणि मुलीच्या मनातली घालमेल या गाण्यातून दाखवण्यात आली आहे.काळजाला भिडणारे सूर,प्रभावी सिनेमॅटोग्राफी आणि आलियासह इतर कलाकारांचा तितकाच प्रभावी अभिनय यामुळे हे गाणं तसंच त्याच्या मेकिंगचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.या गाण्यातील बिदाई सीनसाठी आलियाला तब्बल १७५ वेळा साडी नेसावी लागल्याचे या मेकिंग व्हिडीओतून समोर आले आहे.(Also Read:'राजी' या सिनेमामुळे विकी कौशलचे हे स्वप्न झाले पूर्ण ) मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘राजी’ या सिनेमाची कथा १९७१च्या पार्श्वभूमीवर बेतलेली आहे.यांत आलिया एका महिला गुप्तहेराची भूमिका साकारत आहे.लग्नानंतर तिला पाकिस्तानात जावं लागतं आणि हेच दृश्य चित्रीत करण्यासाठी दिग्दर्शकांना बरीच मेहनत घ्यावी लागली. पूर्ण दृश्य चित्रीत होण्यापर्यंत आलियाला ती साडी १७५ वेळा नेसावी लागली. लग्नानंतर सीमा पार करून जात असतानाचा हा सीन चित्रीत करण्यासाठी बरेच रिटेक घ्यावे लागल्याचे अभिनेता विकी कौशल या व्हिडीओत सांगतो आहे. त्याने या सिनेमात आलियाच्या पतीची भूमिका साकारली आहे.आलियाची रिअल लाईफमधील आई सोनी राजदानही या गाण्यात दिसत असून त्यांच्या आणि आलियाच्या नात्याचंही चित्रण रसिकांच्या काळजाचा ठाव घेईल.अभिनेता रजित कपूर यांनी आलियाच्या खंबीर वडिलांची भूमिका साकारली आहे.गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिले असून शंकर एहसान लॉय यांनी त्याला संगीतबद्ध केले आहे. या गाण्यातील कलाकारांचा अभिनय, गाण्याचे बोल आणि काळजाला भिडणारे सूर यामुळे रसिकांच्या डोळ्याच्या कडाही पाणावल्या शिवाय राहणार नाही.