Join us  

लग्नाबाबत पहिल्यांदा बोलला सलमान म्हणाला, या गोष्टीची आहे खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 12:55 PM

सलमान खानच्या चाहत्यांना केवळ दोन गोष्टींची प्रतीक्षा असते. एक म्हणजे, भाईजानचा सिनेमा आणि दुसरी म्हणजे, भाईजानचे लग्न कधी होणार.

ठळक मुद्देआत्तापर्यंत अनेकींशी सलमानचे नाव जोडले गेले आहे

सलमान खानच्या चाहत्यांना केवळ दोन गोष्टींची प्रतीक्षा असते. एक म्हणजे, भाईजानचा सिनेमा आणि दुसरी म्हणजे, भाईजानचे लग्न कधी होणार. आत्तापर्यंत अनेकींशी सलमानचे नाव जोडले गेले आहे. पण लग्नाची गोष्ट आली की, सल्लू भाई नेहमीच पळ काढत आलाय. सलमान खानचे फॅन फॉलोव्हिंग हे प्रचंड आहे आणि त्यातही त्याच्या महिला चाहत्यांची संख्या ही अधिक आहे. सलमानला बॉलिवूडमधील मोस्ट एलिजेबल बॅचलर मानले जाते. त्यामुळे तो लग्न कधी करणार असा प्रश्न त्याला नेहमीच मुलाखतींमध्ये विचारला जातो आणि सलमान देखील या प्रश्नाला मजेशीररित्या उत्तरं देत असतो. सलमान खान लग्न कधी करणार हा एक जागतिक प्रश्न बनला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.  

सलमानच्या आयुष्यात आजवर संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ यांसारख्या अभिनेत्री आल्या. पण आजही त्याने लग्न केले नाही. संगीतासोबत तर त्याच्या लग्नाची पूर्ण तयारी देखील झाली होती. पण शेवटच्या क्षणी हे लग्न मोडले. अमर उज्जालाच्या रिपोर्टनुसार, एक इंटरव्हु दरम्यान सलमानला विचारण्यात आले की, भारत सिनेमामध्ये कतरिना सलमानला प्रपोज करताना दिसली होती, खऱ्या आयुष्यातही त्याच्यासोबत असे झाले आहे का?

या प्रश्नाचे उत्तर देताना सलमान हसत म्हणाला, ''नाही असे अजून पर्यंत कधी झाले नाही. कारण मी कॅन्डल लाईट डिनरला जात नाही कधी. कॅन्डल लाईटमध्ये मला हे दिसत नाही की आपण काय खातो आहे. मात्र  मला या गोष्टीचं दु:ख आहे की मला लग्नासाठी आतपार्यंत कोणीच प्रपोज केले नाही.'' या गोष्टीची खंत सलमानला अजूनही आहे.

टॅग्स :सलमान खान