दोन वर्ष काम न केल्याने पत्नी ऐश्वर्याची होती अशी रिअॅक्शन; अभिषेक बच्चनचा खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 16:17 IST
दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या आगामी ‘मनमर्जियां’ या चित्रपटातून कमबॅक करणाºया अभिनेता अभिषेक बच्चनने नुकताच एक खुलासा केला. त्याने म्हटले की, ...
दोन वर्ष काम न केल्याने पत्नी ऐश्वर्याची होती अशी रिअॅक्शन; अभिषेक बच्चनचा खुलासा!
दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या आगामी ‘मनमर्जियां’ या चित्रपटातून कमबॅक करणाºया अभिनेता अभिषेक बच्चनने नुकताच एक खुलासा केला. त्याने म्हटले की, गेल्या दोन वर्षांपासून अभिनेता म्हणून कुठलेही काम केले नाही. फिल्म जर्नालिस्ट अनुपमा चोपडा हिला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान त्याने याबाबतची कबुली दिली. तसेच त्याच्या या निर्णयावर पत्नी ऐश्वर्याची काय रिअॅक्शन होती, हेही त्याने सांगितले. अभिषेकने मुलाखतीत म्हटले की, ‘मी असे म्हणत नाही की, मला आता आणखी जास्त अभिनय करायचा नाही, तर माझे एवढेच म्हणणे आहे की, मी ज्या पद्धतीचे चित्रपट करीत आहे, त्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे. मला योग्य चित्रपट मिळण्यासाठी दोन वर्ष लागले. मी माझ्या या दोन वर्षांच्या ब्रेकविषयी फॅमिलीलाही सांगितले होते. ते माझ्या या निर्णयावर सकारात्मक होते. माझी पत्नी ऐश्वर्याही या निर्णयावर माझ्यासोबत राहिली. तिने मला खूप सपोर्ट केला. अभिषेकने यावेळी त्याचे वडील अमिताभ बच्चन यांचेही उदाहरण दिले. अभिषेकने म्हटले की, पापा अमिताभ यांनी चांगला चित्रपट मिळावा म्हणून तब्बल पाच वर्षे प्रतीक्षा केली. बिग बी यांनी १९६९ मध्ये आलेल्या ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. मात्र त्यांना १९७३ मध्ये आलेल्या ‘जंजीर’ या चित्रपटातून खरे यश मिळाले. मुलाखतीदरम्यान अभिषेकला विचारण्यात आले की, जेव्हा ऐश्वर्याने मुलगी आराध्याच्या जन्मानंतर चित्रपटांमध्ये कमबॅक केले तेव्हा तिच्या मनात का चलबिचल होती? उत्तर देताना अभिषेकने सांगितले की, ‘जेव्हा ती चित्रपटांमध्ये परतली तेव्हा तिच्या मनातही असुरक्षिततेची भावना होती की, आता मी काम करू शकणार की नाही? ऐश्वर्याने २०१५ मध्ये ‘जज्बा’ या चित्रपटातून पडद्यावर कमबॅक केले. सध्या ती दिग्दर्शक अतुल मांजरेकर यांच्या ‘फन्ने खां’ या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, अभिषेक अखेरीस फरहाद सामजी आणि साजिद या दिग्दर्शक जोडीच्या ‘हाउसफुल-३’ (२०१६) मध्ये बघावयास मिळाला होता. तब्बल दोन वर्षांनंतर तो दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या ‘‘मनमर्जियां’ं’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करीत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री तापसी पन्नू आणि विक्की कौशल प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.