Join us  

Once Upon a Time : संजय दत्तबरोबरच्या रोमान्सवर अखेर माधुरी दीक्षित बोलली!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2017 3:31 PM

बॉलिवूडचा बाबा अर्थात संजय दत्त अन् धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांच्यातील एकेकाळचा रोमान्स बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय होता. दोघांमधील प्रेम ...

बॉलिवूडचा बाबा अर्थात संजय दत्त अन् धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांच्यातील एकेकाळचा रोमान्स बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय होता. दोघांमधील प्रेम एवढे बहरले होते की, एक क्षणदेखील ते एकमेकांपासून दूर राहत नसत. परंतु १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर जेव्हा संजय दत्तला टाडाअंतर्गत अटक करण्यात आली तेव्हा माधुरीने संजूबाबापासून चार हात लांब राहणे पसंत केले. आता तुम्ही म्हणाल की, एवढी जुनी गोष्ट आज सांगण्याचे काय कारण? तर तुम्हाला आम्ही साांगू इच्छितो की, ९०च्या दशकातील या प्रेमवीरांच्या रोमान्सच्या बातम्या पुन्हा एकदा समोर येऊ लागल्या आहेत. वास्तविक जेव्हा संजय दत्तला अटक करण्यात आली होती, तेव्हा माधुरीने मीडियामध्ये स्पष्ट केले होते की, ती कधीच संजय दत्तबरोबर रोमॅण्टिकली इनव्हॉल नव्हती. त्यानंतर संजूबाबानेदेखील पुन्हा माधुरीशी जवळिकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला नव्हता. आता हे दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले असले तरी, त्यांच्यातील रोमान्सच्या चर्चा पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा रंगली होती की, संजूबाबाच्या बायोपिकमध्ये माधुरी एक भूमिका साकारणार आहे. एवढेच नव्हे तर जेव्हा माधुरीला ही बाब समजली होती की, राजकुमार हिरानी त्यांच्या ‘दत्त’ या बायोपिकमध्ये तिची भूमिका ठेवत आहे तेव्हा तिने संजूबाबाला फोनही केला होता. तिने संजूबाबाला विनंती केली होती की, त्याच्या बायोपिकमध्ये तिच्याशी संबंधित कुठल्याही प्रकारचे डायलॉग किंवा सीन्स ठेवले जाऊ नये. या चित्रपटात संजूबाबाची भूमिका अभिनेता रणबीर कपूर साकारत आहे. जेव्हा माधुरीला या चर्चांविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने एका वृत्तपत्राला मुलाखत देताना स्पष्ट केले की, या निव्वळ अफवा आहेत. माधुरीने म्हटले की, ‘अशाप्रकारच्या चर्चांना आता माझ्या आयुष्यात काहीच स्थान नाही. मी राजकुमार हिरानी आणि संजय दत्तला कधीच फोन केला नाही.’पुढे बोलताना माधुरीने हेही स्पष्ट केले की, ‘मला माहीत नाही की, अशाप्रकारच्या बातम्या कोण पसरवित आहे. मीच नव्हे तर प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या चर्चांचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही, मुळात मला याबाबत काहीच देणेघेणे नाही.’ संजूबाबापासून दूर गेल्यानंतर माधुरीने कित्येक वर्षे कोणासोबतच नाते प्रस्थापित केले नव्हते. अखेर तिने चित्रपटाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसलेले डॉ. राम नेने यांच्याशी विवाह केला. तर संजय दत्तने दोन विवाह केल्यानंतर मान्यता हिच्याशी विवाह केला. आता तो त्याच्या संसारात खूश असून, त्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. मात्र वृत्तानुसार संजूबाबाच्या बायोपिकमध्ये अभिनेत्री सोनम कपूर किंवा करिष्मा तन्ना या दोघींपैकी कोणीतरी माधुरीची भूमिका साकारणार हे निश्चित. चित्रपटात संजय दत्तच्या आईची भूमिका अभिनेत्री मनीषा कोईराला साकारत आहे, तर त्याच्या वडिलांच्या भूमिकेत परेश रावल दिसणार आहे.