Join us  

​‘मेरे करण-अर्जुन आयेंगे’! शाहरूख - सलमानची जोडी पुन्हा चर्चेत !!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2017 8:23 AM

सलमान खान व शाहरूख खान या दोघांची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आहे. ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार, ...

सलमान खान व शाहरूख खान या दोघांची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आहे. ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार, अशी चर्चा नव्याने रंगू लागली आहे. होय,  ‘करण अर्जुन’नंतर याच चित्रपटाच्या सीक्वलमध्ये ही जोडी दिसणार, अशी चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश रोशन ‘करण अर्जुन2’ आणू इच्छितात. अर्थात ही योजना तूर्तास अतिशय प्राथमिक टप्प्यात आहे. पण राकेश रोशन यांनी शाहरूख व सलमानशी याबाबत चर्चा केली आहे आणि दोघांनीही यात रस दाखवला आहे.राकेश रोशन दिग्दर्शित ‘करण अर्जुन’ पुनर्जन्मावर आधारित एक हिट चित्रपट होता. या चित्रपटात शाहरूख व सलमान पहिल्यांदा एकत्र दिसले होते. या चित्रपटानंतर शाहरूख व सलमान कधीच एकत्र दिसले नाहीत. ‘करण अर्जुन’नंतर सलमान-शाहरूख हे दोघे मित्र दोघेही एकमेकांच्या चित्रपटात कॅमिओ करताना दिसले. सलमानने शाहरूखच्या ‘कुछ कुछ होता है’मध्ये कॅमिओ केला. तर शाहरूख सलमानच्या ‘हर दिल जो प्यार करेगा’मध्ये कॅमिओ करताना दिसला. २००७ मध्ये शाहरूखच्याच होम प्रॉडक्शनच्या ‘ओम शांती ओम’मध्येही सलमान झळकला. यादरम्यान शाहरूख श्रेष्ठ की सलमान श्रेष्ठ अशी बरीच स्पर्धा झाली. पण या स्पर्धेचा शाहरूख-सलमानच्या मैत्रीवर कुठलाही परिणाम झाला नाही. पण ‘चलते-चलते’ या  सिनेमाचे शूटींग सुरु असताना  शाहरूख आणि सलमानमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली. या चित्रपटासाठी सर्वप्रथम ऐश्वर्या रायला (सलमानची तत्कालीन गर्लफ्रेन्ड) साईन करण्यात आले होते. पण कुठल्याशा कारणावरून सलमानने ‘चलते-चलते’च्या सेटवर जाऊन मोठा धिंगाणा घातला. यानंतर आणखी ड्रामा नको म्हणून शाहरूखने ऐश्वयार्ला लगेच या चित्रपटातून डच्चू दिला. येथून सलमान-शाहरूखे बिनसले. यानंतर २००८ मध्ये कॅटरिना कैफच्या बर्थ-डे पार्टीत दोघांमधील मैत्रीची जागा वैराने घेतली. १६ जुलै २००८च्या रात्री रंगलेल्या या पार्टीत सलमान व शाहरूखमध्ये भांडण झाले आणि दोघेही एकमेकांचे शत्रू झाले. या भांडणामुळे बॉलिवूडच नव्हे तर दोघांचे चाहतेही दोन गटात विभागले गेले. दोघेही यानंतर कधीच एकत्र दिसले नाही.