Join us  

​करण जोहर व काजोल पुन्हा मित्र! हिरू जोहर यांच्या बर्थ डे पार्टीत दोघांचीही धम्माल मस्ती!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 7:39 AM

एकेकाळी करण जोहर आणि काजोल यांच्याइतकी घनिष्ठ मैत्री इंडस्ट्रीत कुणाचीही नव्हती. पण अचानक या मैत्रीला कुणाची तरी दृष्ट लागली. ...

एकेकाळी करण जोहर आणि काजोल यांच्याइतकी घनिष्ठ मैत्री इंडस्ट्रीत कुणाचीही नव्हती. पण अचानक या मैत्रीला कुणाची तरी दृष्ट लागली. एक क्षुल्लक कारण झाले आणि काजोल व करणच्या मैत्रीत दरी निर्माण झाली. इतकी की, दोघांनीही एकमेकांना टाळणे सुरु केले. पण कदाचित हा दोघांच्याही मैत्रीतील ‘बॅड पॅच’ होता.  कारण असे नसते तर हे जुने सख्खे मित्र पुन्हा एकत्र आले नसते. होय, करण व काजोल यांच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सगळे मतभेद बाजुला सारून करण व काजोल पुन्हा एकत्र आले आहेत. काल करणची आई हिरू जोहर यांच्या बर्थ डे पार्टीत याचा पुरावा पाहायला मिळाला.काल रविवारी मध्यरात्री हिरू यांचा ७५ वा वाढदिवसाची शानदार पार्टी रंगली. करण जोहरच्या इंडस्ट्रीतील सगळ्यांत जवळच्या मित्रांनी या पार्टीला हजेरी लावली. यात काजोलही होती. काजोलने पार्टीला केवळ हजेरीचं लावली नाही तर करणसोबत धम्माल मस्तीही केली.२०१६ च्या दिवाळीत करण व काजोलमध्ये मतभेद निर्माण झाले होते आणि याला कारणीभूत ठरला होता तो काजोलचा पती अजय देवगण. होय, करणचा ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि अजय देवगणचा  ‘शिवाय’ हे दोन चित्रपट त्या दिवाळीत एकाचवेळी बॉक्सआॅफिसवर धडकले होते. याच बॉक्सआॅफिस क्लॅशमुळे करण व काजोलमध्ये दुरावा निर्माण झाला होता.करणने केआरकेला ‘शिवाय’ची नकारात्मक प्रसिद्धी करण्यासाठी पैसे दिलेत, अशी बातमी त्यावेळी पसरली होती. या संपूर्ण पार्श्वभूमीवर करणने आपल्या आत्मचरित्रात काही खुलासे केले होते. काजोलसोबत आता माझे कुठलेही नाते राहिलेले नाही, असे त्याने सांगून टाकले होते. आमच्यात काही मतभेद झालेत. असे काही घडले, ज्यामुळे मी खोलवर दुखावला गेलो. मी याबद्दल काहीही बोलणार नाही. कारण मला जे झाले ते सगळे चव्हाट्यावर आणायचे नाही. दोन दशकांपासून आमची घनिष्ठ मैत्री होती. पण आता आम्ही एकमेकांकडे पाहून केवळ हाय-हॅलो करतो व पुढे निघतो. खरे तर तिच्यात व माझ्यात काहीही बिनसलेले नव्हतेच. जे काही झाले ते माझ्यात व तिच्या पतीदरम्यान झाले होते. जे काही घडले, ते केवळ ती, मी व तिचा पती एवढे तिघेच जाणतो. पण मी ते सगळे मागे सोडू इच्छितो. २५ वर्षांची मैत्री विसरून ती आपल्या पतीची साथ देत असेल तर माझ्यामते, हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे, असे तो म्हणाला होता.ALSO READ : अजय देवगणच्या ‘रेड’मधून ८५ वर्षांच्या ‘या’ आजीबार्इंनी केली बॉलिवूडमध्ये एंट्री; काजोलने केला व्हिडीओ शेअर!