Join us  

आणखी एका महिलेने अरमान कोहलीविरोधात दाखल केला गुन्हा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 2:55 PM

अभिनेता अरमान कोहली पुन्हा नव्या वादात सापडला आहे. होय, नादिया अली नामक महिलेने अरमान, त्याचा मित्र दिलीप राजपूत व नोकर नितीनविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

ठळक मुद्देअरमानने आपल्याकडून ५० लाख रूपये घेतले होते. पण आता तो ते परत करण्यास नकार देतो आहे. पैसे परत मागितल्यावर त्याने आपल्याला धमकी देत मारहाण केल्याचे नादियाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

अभिनेता अरमान कोहली पुन्हा नव्या वादात सापडला आहे. होय, नादिया अली नामक महिलेने अरमान, त्याचा मित्र दिलीप राजपूत व नोकर नितीनविरोधात एफआयआर दाखल केला आहे. अरमानने आपल्याकडून ५० लाख रूपये घेतले होते. पण आता तो ते परत करण्यास नकार देतो आहे. पैसे परत मागितल्यावर त्याने आपल्याला धमकी देत मारहाण केल्याचे नादियाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी अरमानची एक्स-गर्लफ्रेन्ड नीरू रंधावा हिने अरमानवर मारहाण केल्याची तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीनंतर अरमानला तुरुंगात जावे लागले होते.

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, नादिया काही महिन्यांपूर्वी अरमानसोबत विदेशात गेली होती. याठिकाणचा दोघांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अरमान दारूच्या नशेत धूंद असून नादियासाठी गाणे गाताना दिसतेय. त्याच्या शेजारी नादिया बसलेली आहे.अरमानवर अनेकदा गर्लफ्रेन्डला मारहाण केल्याचे आरोप झाले आहेत. नीतू रंधावा व आता नादियापूर्वी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम मुनमून दत्ता हिने अरमानवर मारहाणीचा आरोप केला होता. अभिनेत्री काजोलची बहीण तनीषा मुखर्जी हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना अरमानने तिलाही मारहाण केली होती, अशी माहितीही समोर आली होती. खुद्द नीरू रंधावाने तसा दावा केला होता.  अरमानने तनीषावरही हात उचलला होता. मला नोकरांकडून ही बाब कळली, अरमान तनीषाला मारहाण करायचा, हे  तनीषाच्या काही मित्रांनीही मला सांगितले, असे नीरूने म्हटले होते. त् अरमान व तनीषा यांचे अफेअर ‘बिग बॉस 7’मध्ये सुरू झाले होते.

अरमानने नव्वदीच्या दशकात अनेक चित्रपटात काम केले आहे. पण त्याचा कोणताच चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही. त्याने काही वर्षांपूर्वी प्रेम रतन धन पायो या चित्रपटात काम केले होते. पण त्याच्या अभिनयाची तितकीशी चर्चा झाली नाही. अरमान हा सर्वात जास्त प्रसिद्ध बिग बॉस या कार्यक्रमामुळेच झाला. बिग बॉसच्या घरात असताना सगळ्यांशी भांडणे, सगळ्यांवर उगाचच ओरडणे, स्वतःच्या रागावर नियंत्रण नसणे या सगळ्या गोष्टींमुळे तो प्रचंड फेमस झाला होता. 

टॅग्स :अरमान कोहली