Join us  

चारच दिवसांत अर्जुन रामपालने कोरोनावर केली मात, सांगितले त्यामागचे सिक्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 5:58 PM

अर्जुनने चारच दिवसांत कोरोनावर मात केली असल्याचे त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे. 

ठळक मुद्देअर्जुनने केवळ चारच दिवसांत कोरोनावर कशाप्रकारे मात केली यामागचे सिक्रेट त्याने सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे.

अर्जुन रामपालला कोरोनाची लागण झाली असल्याचे त्याने सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले होते. पण आता त्याने चारच दिवसांत कोरोनावर मात केली असल्याचे त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे. 

अर्जुनने केवळ चारच दिवसांत कोरोनावर कशाप्रकारे मात केली यामागचे सिक्रेट त्याने सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सगळ्यांचे आभार.... मी इतक्या लवकर कोरोनावर मात कशी केली याबाबत मी माझ्या डॉक्टरांना विचारले असता त्यांनी मला सांगितले की, मी कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्याने मला त्याचा फायदा झाला. लसीमुळे कोरोनाचा प्रभाव खूपच कमी होता. तसेच माझ्यात लक्षणं देखील कमी होती. त्याचमुळे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही देखील कोरोनाची लस लवकरात लवकर घ्या... 

अर्जुनने काही दिवसांपूर्वी पोस्ट करून सांगितले होते की, माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. माझ्यात कोणतीही लक्षणे नाहीत. पण तरीही मी स्वत:ला क्वारंटाइन केले आहे आणि आरोग्याची काळजी घेत, सर्व नियमांचे काटेकोर पालन करतोय. काही काळ तरी स्वत:ची काळजी घ्या, यामुळे फायदाच होईल. आपल्याला एकत्र येऊन कोरोनाशी लढा द्यावा लागेल.

टॅग्स :अर्जुन रामपाल