Join us  

२ वर्षांचं अफेअर, थाटात केला साखरपुडा, पण एक वादळ आलं अन् अभिनेत्याने लग्न मोडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2023 10:53 AM

साखरपुड्यानंतर इटलीमध्ये लग्नाच्या तयारीत सुरु झाली होती या लग्नासाठी 700 सेलिब्रिटी आणि नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आलं होते, पण...

सुपरस्टार नागार्जुनचा धाकटा मुलगा अखिल अक्किनेनी हा तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. तसे पाहता अखिलने फार कमी चित्रपटांतून साऊथ फिल्म इंडस्ट्रीत खूप नाव कमावले आहे. पण त्याच्या आयुष्यातील सर्वात जास्त लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे त्याचं मोडलं लग्न. आज अखिलचा वाढदिवस आहे निमित्त आम्ही तुम्हाला त्याच्या लव्ह लाईफमध्ये आलेल्या वादळाविषयी सांगणार आहोत.

 अखिलचा जन्म 8 एप्रिल 1994 रोजी साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि त्याची पत्नी अमला यांच्या घरी झाला. या मुलाला त्याच्या आयुष्यात सर्वकाही मिळाले होते. आई-वडील आणि भावाप्रमाणेच अखिलनेही सुरुवातीपासूनच फिल्मी दुनियेत पाऊल ठेवण्याचे स्वप्न पाहिले होते.अखिलने फक्त एका वर्षांचा होता जेव्हा वडिलांची निर्मित असलेल्या 'सिसिंद्री' या विनोदी चित्रपटात तो दिसला होता. 

वडील आणि भावाप्रमाणे नाव कमवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अखिलने 2014 साली 'मनम' चित्रपटात कॅमिओ केला. यानंतर अखिलने एकामागून एक अनेक चित्रपटांमध्ये काम केले. हळूहळू अखिल लोकांच्या नजरेत आणि मुलींच्या मनात घर करू लागला. अखिलचे श्रिया भूपलवर प्रेम जडलं. अखिल लहान वयातच श्रियाच्या प्रेमात पडला होता आणि दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण त्याच्या आयुष्यात असे वादळ आले की सर्व काही उद्ध्वस्त झाले.

एकीकडे 'हॅलो', 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' सारखे हिट चित्रपट देऊन अखिल त्याच्या करिअरमध्ये यशाच्या पायऱ्या चढत होता. अखिलने लहान वयातच श्रिया भूपालशी 2016 मध्ये एंगेजमेंट केली यानंतर दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली होती.

 इटलीमध्ये लग्नाच्या तयारीत सुरु झाली होती या लग्नासाठी 700 सेलिब्रिटी आणि नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आले होते. पण त्यानंतर एंगेजमेंटनंतर दोनच महिन्यांत अखिल आणि श्रियामध्ये एअरपोर्टवर भांडणं झाली की दोघांचे नातं कायमच संपलं. त्यानंतर अखिल-श्रिया हे लग्न मोडून कायमचे वेगळे झाले.

 

टॅग्स :नागार्जुन