Join us

कौटुंबिक आयुष्याबद्दल पहिल्यांदाच बिंधास्त बोलली ऐश्वर्या राय-बच्चन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 20:07 IST

बच्चन परिवार नेहमीच लाइमलाइटमध्ये राहत असतो. त्यामध्ये नात आराध्याही सातत्याने माध्यमांमध्ये झळकत असते. मम्मी ऐश्वर्या नेहमीच मुलगी आराध्यासोबत इव्हेंट ...

बच्चन परिवार नेहमीच लाइमलाइटमध्ये राहत असतो. त्यामध्ये नात आराध्याही सातत्याने माध्यमांमध्ये झळकत असते. मम्मी ऐश्वर्या नेहमीच मुलगी आराध्यासोबत इव्हेंट किंवा शाळेच्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असते. याविषयी जेव्हा ऐश्वर्याला विचारण्यात आले तेव्हा तिने त्यामागचे खरे कारण सांगितले. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना ऐश्वर्याने याबाबतची माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या आराध्याच्या शाळेमध्ये स्पॉट झाली होती. यावेळी अभिषेक बच्चन आणि जया बच्चनही बघावयास मिळाले होते. अशात हा प्रश्न उपस्थित केला गेला की, ते हे सर्व कशा पद्धतीने मॅनेज करतात. याच अनुषंगाने ऐश्वर्याने सांगितले की, ‘मी माझ्या मुलीला तीच वागणूक देतो, जे सर्वसामान्य परिवारात आपल्या मुलांना दिली जात असते.’पुढे बोलताना ऐश्वर्याने म्हटले की, मी तिच्यासोबत केवळ पार्कमध्येच नाही तर बाजारातही जात असते. जेणेकरून तिला सर्वसामान्य आयुष्याची जाणीव व्हावी. यावेळी ऐश्वर्याला हेदेखील विचारण्यात आले की, ‘तू कधी आराध्याला विचारले काय की, मीडियाच्या झगमगटाला तू कशा पद्धतीने हॅण्डल करीत असते? यावर बोलताना ऐश्वर्याने म्हटले की, ‘मी या मुद्दावर कधी आराध्याशी बोलली नाही. ती एक लहान मुलगी आहे. मी तिला याबद्दल विचारू शकत नाही. कारण ती यासर्व प्रकाराला समजून घेते की, नाही याचीच अजून तिला फारशी जाण नाही. ऐश्वर्याने म्हटले की, ‘आराध्या हे सर्व काही लहानपणापासूनच बघत आहे. वास्तविक मी हे सर्व वयाच्या २०व्या वर्षी बघितले होते. त्यामुळे तिच्यासाठी हे सर्वसामान्य आहे की नाही हे सांगणे मुश्किल आहे. वास्तविक सेलिब्रिटींची मुले नेहमीच लाइमलाइटमध्ये राहत असतात. मात्र जेव्हा बच्चन फॅमिलीचा विषय येतो तेव्हा सर्व कॅमेरे त्यांच्या दिशेने असतात. त्यामुळे सातत्याने आराध्याचे फोटो माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ऐश्वर्या लवकरच ‘फन्ने खां’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता अनिल कपूर याच्यासोबत दिसेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा करीत आहेत. हा चित्रपट १३ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर अशाही बातम्या समोर येत आहेत की, ऐश्वर्याने एक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट साइन केला आहे.