Join us  

वाचा ऐश्वर्या असे का म्हणाली की, सलमान हे माझ्या आयुष्यातील एक वाईट स्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 7:42 PM

ऐश्वर्याने 2002 ला दिलेल्या एका मुलाखतीत ती सलमानसोबत नात्यात होती अशी तिने कबुली दिली होती. पण तिने या मुलाखतीत सलमानवर अनेक आरोप केले होते.

ठळक मुद्देसलमान व ऐश्वर्याची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी बनली होती. मात्र काही कालावधीनंतर त्या दोघांच्या नात्यात इतकी कटूता आली की ते दोघे आता एकमेकांचं नाव घेणे देखील टाळतात.

साल 1999. रुपेरी पडद्यावर झळकला होता हम दिल दे चुके सनम. हा चित्रपट त्यावेळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवित होता. या चित्रपटाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. या चित्रपटात सलमान खान व ऐश्वर्या राय ही जोडी होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर या दोघांची केमिस्ट्री सगळ्यांनाच खूप भावली होती. हिंदी चित्रपटांचे चाहते तेव्हा खूश झाले जेव्हा त्यांना समजले की दोघेही खऱ्या जीवनात एकमेकांना डेट करत आहेत. सलमान व ऐश्वर्याची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी बनली होती. मात्र काही कालावधीनंतर त्या दोघांच्या नात्यात इतकी कटूता आली की ते दोघे आता एकमेकांचं नाव घेणे देखील टाळतात.

ऐश्वर्याने 2002 ला दिलेल्या एका मुलाखतीत ती सलमानसोबत नात्यात होती अशी तिने कबुली दिली होती. पण तिने या मुलाखतीत सलमानवर अनेक आरोप केले होते. ती म्हणाली होती की, आमचे ब्रेकअप काही महिन्यापूर्वी झाले. पण सलमान ही गोष्ट स्वीकारायला तयार नव्हता. त्याने माझा मानसिक छळ केला. तो फोन करून मला सतवायचा. माझे माझ्या सहकलाकारांसोबत अफेअर असल्याचे तो बोलायचा. शाहरुख खान, अभिषेक बच्चन यांसारख्या कलाकारांसोबत माझे नाव जोडले. मी फोन घेत नसल्याने तो स्वतःला त्रास करून घेत होता.

पुढे तिने या मुलाखतीत सांगितले की, सलमानच्या या वागणुकीवर मी गप्प राहाणेच पसंत केले. पण तरीही सलमान, त्याच्या कुटुंबियांनी, त्याच्या मित्रपरिवाराने मला प्रचंड सतवले. मी त्याला नेहमीच साथ दिली. पण त्याने मला कायम त्रासच दिला. सलमान हे माझ्या आयुष्यातील वाईट स्वप्न होते. हे सगळं लवकरच संपलं यासाठी मी देवाचे आभार मानते. 

टॅग्स :सलमान खानऐश्वर्या राय बच्चन