Join us  

'झिरो'नंतर अनुष्का शर्मानं या कारणामुळे घेतला चित्रपटातून ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 6:00 AM

डिसेंबरला झिरो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनुष्का शर्माने कोणताच नवा प्रोजेक्ट साईन केला नाही.

 अनुष्का शर्मासाठी मागील वर्षे खूप व्यग्र होतं. तिचे परी, संजू, सुईधागा व झिरो असे चार चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र डिसेंबरला झिरो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनुष्का शर्माने कोणताच नवा प्रोजेक्ट साईन केला नाही. बॉलिवूडमधून घेतलेल्या ब्रेकमुळे बऱ्याच अफवांना उधाण आलं. इतकंच नाही तर ती बॉलिवूडला रामराम करणार असल्याचीही अफवा पसरली होती.मात्र ही सगळी वृत्त खोटी ठरली.

फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत अनुष्काने चित्रपटातून ब्रेक घेतल्याबाबतच्या वृत्ताचा खुलासा केला. ती म्हणाली की, झिरो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही महिने ब्रेक घेतला. जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हा खूप मोठा बदल झाला. त्यानंतर लगेच मी सुई धागाच्या सेटवर परतली आणि नंतर झिरो. 

अनुष्काने सांगितलं की, मी बॅक टू बॅक काम करत होती. जो काही वेळ मिळायचा तो मी बॅलन्स करायची आणि विराटला भेटायचे. मला जाणीव होत होती की मी खूप काम केलं आहे. 

अनुष्काने सांगितलं की, मला दोन महिन्याचा ब्रेक हवा होता. माझ्या टीमला मी सांगितलं की मला आता काहीही वाचायचं नाही. क्रिएटिव्ह व्यक्तीला थोडा वेळ हवा असतो. मात्र प्रेशरमुळे स्वतःसाठी वेळ काढत नाही. तुम्हाला वारंवार विचारलं जातं की कोणता चित्रपट साइन करते आहेस? मुलाखतीत अनुष्काने ब्रेकला घेऊन बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मात्र तिने कोणत्या चित्रपटातून कमबॅक करणार हे नाही सांगितलं.

बॉलिवूडमधून ब्रेक घेतल्यानंतर दरम्यानच्या काळात अनुष्का नवरा विराट कोहलीसोबत दिसली होती. वर्ल्ड कप सामन्यादरम्यान अनुष्का विराटला चिअर अप करताना दिसली होती. अनुष्का बॉलिवूडनंतर डिजिटल जगतात पाऊल टाकणार आहे.

अनुष्का लवकरच तिचे प्रोडक्शन हाऊस क्लीन स्लेट फिल्म्स बॅनरअंतर्गत माई नामक वेबसीरिज घेऊन येत आहे.

या वेबसीरिजमध्ये अनुष्का शर्मा दिसणार नाही. ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर पहायला मिळणार आहे.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली